Skip to main content

Posts

Showing posts from August, 2018

गावपण भाग 2 : खिळपाट

खिळपाट गावपण या सदरात आपण गावाकडच्या तिखटमीठ आठवणी ,शब्द , संस्कृती आणि संकल्पनांचा स्वैर आनंद घेणार आहोत .या गावरान जमान्यातील काही गावरान संकल्पनांना मोकळी वाट करून देण्यात माझाही काही वाटा असावा.   या उद्देशाने आज खीळपाट काय असते ते बघुयात . खिळपाट म्हणजे एकावर एक दगड कलात्मक आणि रचनात्मक पद्धतीने रचून बांधलेली भिंत .पूर्वी 'कोपी' किंवा 'सप्पर' बांधण्यासाठी छातीइतक्या उंचीची दगडाची आणि फक्त दगडाची भिंत रचली  जायची त्याला म्हणायचे 'खिळपाट' .त्याला काही ठिकाणी 'पवळ' देखील म्हटले जाते . आमचे आजोबा गोविंद दंडवते म्हणजेच आख्ख्या गावाचे छबूतात्या यांच्यासोबत दोन खिळपाट बांधण्याचा योग माझया पत्रिकेत आला हे केवळ भाग्यच . आता खिळपाट बांधायला सुरुवात झाली ती टिकावाने थोडा पाया खांदला .जमीन साफ केली आणि मग तोडी रचायला सुरुवात झाली . एक एक मोठाल्या तोडी  मी दादांना आणून द्यायचो . 'तोड' म्हणजे विशिष्ट आणि रचता येईल असा उपयुक्त दगड . पोटात नळ येईपर्यंत उचललेल्या तोडी अजूनही लक्षात राहिल्या आहेत.खिळपाट साधारण दोन फूट रुंद असते.  लांबी आपल्य...

आकाशाखालच्या आठवणी 2

वाटलं नव्हतं तू असा असशील .... मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होतो फक्त समाजामूळे आणि त्याच्या समाजातील आस्तित्वामुळे ...अनेक नाती ,त्या नात्यांची वेगळी अंगे ,त्यांची भिन्न भिन्न भावविश्वे जपत हे आयुष्य पुढे जात असतं .आपल्या आपल्या परीने पूर्णत्व गाठत असतात .ही आयुष्ये पूर्णत्वाच्या अनेक नव्या व्याख्या बनवत असतात तर कधी पूर्णत्वाची परिमाणे बनवून नवे उच्चांक आदर्श म्हणून समाजापुढे ठेवत असतात .      प्रत्येक आयुष्यासाठी त्याच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित व्यक्तींच्या मनात काही संदर्भ असतात . काही पूर्वग्रह असतात .संबंध आल्यावर असे पूर्वग्रह बदलतात ,चांगली वळणे घेतात कधी चुकीचे असतात .नेहमी बोललं जातं की पूर्वग्रह ठेऊ नयेत परंतु ही मानवी मनांची एक सहज स्वाभाविक अभिव्यक्ति आहे .त्यामुळे ते बनत असतात .खरं सांगायचं झालं तर पूर्वग्रहांच्या पातळीवर आपले अंदाज तपासून पाहण्याची मजा अनुभवायलाच हवी .            काल परवा एका जुन्या मैत्रिणीला भेटण्याचा योग आला .महाविद्यालयातील भेटीनंतर अनेक दिवसांनी भेटल्याने खूप आठवणी अगदी ढगफुट...

आकाशाखालच्या आठवणी 1

स्टुपिड …       मला माझ्या जाणत्या वयापासून आव्हानांनी खचाखच भरलेल्या आणि बिनधास्त बावळट जीवनांचा हेवा वाटायचा .आपणही ही जीवन जगावं असं मनोमन वाटायचं .आव्हानांना पोलादी हातांनी आणि वज्रमुठींनी फोडून काढावं असा वाटायचं .छातीतल्या धगधगणाऱ्या निखाऱ्याने संकटांना होरपळून काढावं वाटायचं .श्वासांच्या वादळाने त्या आव्हाणांची फोलपटांसारखी अवस्था करावी वाटते .कधी वाटतं इतकं बावळट व्हावं की आव्हानांनीच आपला पाठलाग करणं सोडून द्यावं .इतकं बेफिकीर व्हावं की अडथळ्यांनाच  माझा हेवा वाटावा .जरी अडखळलो तरी ,जरी धडपडलो तरी त्याची काहीही तमा बाळगू नये . मान्यच करू नये की हा माझा अपमान आहे .मान्यच करू नये की ही माझी हार आहे .किंबहुना कळूच  नये मला की हार काय आणि जीत काय ?इतकं स्वतंत्र व्हावं की एखाद्या आसमानाचा तारा व्हावं ,इतकं दिशाहीन व्हावं की आभाळाचा छोटासा तुकडा …पण तुटलेल्या पतंगाचं स्वातंत्र्य मला आवडत नसायचं कारण आयुष्याला काही अर्थ असावा उद्दिष्ट असावीत ही मात्र माझ्या विचारांमधली एक पक्की बाजू होती .कशी तयार  झाली होती माहीत नाही .       ...

प्रासंगिक 2

    हा काय कोलाहल आहे ? आज काय सुरु आहे या राष्ट्रात ?केवळ प्रश्न आणि उत्तरांची अवास्तव स्वप्ने ...प्रश्न फार सोप्पे पण उत्तरे कधी मिळालीच नाहीत ...अनेक परंपरा ,विविधता ,जात आणि धर्माच्या आपण अभेद्य बनवलेल्या कड्या ....त्यातून झालेला एखाद्या माथेफिरू धार्मिक संघटनेचा जन्म ,त्यातून त्याच धर्माची तुडवली गेलेली तत्वे आणि स्वतःला पुढारलेल्या तत्वांच्या स्वरूपात पेश करण्याची घाई ....त्यात या सगळ्या विविधतेला डावलून नव्हे तर स्वीकारून एकतेचं अमृत पिऊन स्वीकारलेल ला ( काहींनी मनाविरुद्ध) पण थेट हृदयाजवळ ठेवलेला संविधान नावाचा गुरुमंत्र ....यात अनेक प्रधानमंत्र्यांची आणि राजनेत्यांची बदललेली, कधी उजळलेली भूमिका ,त्यातून भारताची  आणि पर्यायाने जनमानसाची भारतीय म्हणून उदयाला आलेली एक सोशिक अस्मिता...           झालेली अनेक आंदोलने आणि त्यातून बदललेली मानसिकता  ...धर्म या अर्थपूर्ण शब्दाचा किंवा भावनेचा बदलेला अर्थ ,त्याची बदलेली व्याख्या आणि त्या शब्दामागे वाढलेला अंधत्वाचा आणि आंधळ्यांचा  रेटा ,भारतीय समाजव्यवस्थेमध्ये झालेला पाश्...

प्रासंगिक १

मैत्री दिनाच्या निमित्ताने .... मैत्री माणसांशी, आपली भाषा कळत नसलेल्या लोकांशी, मैत्री निसर्गाशी, दगडांशी, डोंगराशी, पाण्याशी, रस्त्यावरल्या मातीशी, गाडीच्या चाकामुळे उधळलेल्या धुळीशी, चंद्र चांदण्यांशी ,अनोळखी चेहऱ्यांशी ,पाऊल ठशांशी ,तृणपर्णावरल्या मोत्यांशी ,अंगाखांद्यावर यथेच्छ लोळू दिलेल्या बैल जोडीशी ,मैत्री असंख्य जणांशी.... मैत्री हळुवार हृदयाला भिडलेल्या व्यक्तित्वाशी ,सागराच्या लाटेशी, उधळलेल्या रस्त्याशी ,पिकलेल्या पानाशी अन सुकलेल्या गुलाबाशी ....मैत्री स्वतःशी ,मैत्री अद्वैताशी ,विज्ञानाशी ,गणिताशी...मैत्री ओंकाराशी ...मैत्री निर्मितीसत्वाशी ... मैत्री हे खरंच अजब रसायन एकमेकांसाठी जगण्यात एकमेकांशिवाय काहीच नसतं . मैत्री कोणाशी देखील होऊ शकते. मैत्रीमध्ये कसलेही बंधन नसते . अगदी उजाड माळरानाशी देखील मैत्री होते . फ्रेंडशिप इज वन सोल इन टू बॉडीज असं म्हटलं जातं.  खरं दोन जीवांमध्ये असलेल्या एका आत्म्याचं वास्तव्य म्हणजे मैत्री . यासाठी दोघांचे विचार सारखे असावेत असं नाही . फक्त एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी एकदा धडपड सुरू झाली की मैत्रीचं नातं फु...

कवितेच्या गावा जावे -4

मला हल्ली जगण्याचं काहीच वाटत नाही दाटून येतं पाणी पण पापण्यांमध्ये साठत नाही पडून जातं  मातीत पण गालावर गोठत नाही पावसाच्या थेंबांइतकं  सहज पडतं पाणी ढगांसारखं हलकं वाटतं ,खाली मात्र विचित्र आणीबाणी फांदी मोकळी होते अलगद गळलेल्या पानांबरोबर पुन्हा एकदा स्वार होते भिरभिरत्या वाऱ्यावर नवीन पालवीच्या प्रतीक्षेत चिघळलेल्या जखमांबरोबर पिकलं सुकलं पिवळं पान जमिनीवर विसावतं पुन्हा पालवी बनून सळसळण्यासाठी फांदीला जखम देऊन मातीला मिळण्यासाठी नियतीचा नियम अजून फांदीला कळण्यासाठी .वेदनांच्या भीतीने फांदी कधी पालवीला छाटत नाही पान मात्र रंग बदलत राहतं उगवतीपासून मावळतीपर्यंत तापला कितीही सूर्य तरी रंगात कधी विटत नाही खैदान आलं तरी अर्ध्यात कधी फाटत नाही मला हल्ली जगण्याचं काहीच वाटत नाही ....                                             ...