Skip to main content

आकाशाखालच्या आठवणी 2


वाटलं नव्हतं तू असा असशील ....

मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होतो फक्त समाजामूळे आणि त्याच्या समाजातील आस्तित्वामुळे ...अनेक नाती ,त्या नात्यांची वेगळी अंगे ,त्यांची भिन्न भिन्न भावविश्वे जपत हे आयुष्य पुढे जात असतं .आपल्या आपल्या परीने पूर्णत्व गाठत असतात .ही आयुष्ये पूर्णत्वाच्या अनेक नव्या व्याख्या बनवत असतात तर कधी पूर्णत्वाची परिमाणे बनवून नवे उच्चांक आदर्श म्हणून समाजापुढे ठेवत असतात .




     प्रत्येक आयुष्यासाठी त्याच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित व्यक्तींच्या मनात काही संदर्भ असतात . काही पूर्वग्रह असतात .संबंध आल्यावर असे पूर्वग्रह बदलतात ,चांगली वळणे घेतात कधी चुकीचे असतात .नेहमी बोललं जातं की पूर्वग्रह ठेऊ नयेत परंतु ही मानवी मनांची एक सहज स्वाभाविक अभिव्यक्ति आहे .त्यामुळे ते बनत असतात .खरं सांगायचं झालं तर पूर्वग्रहांच्या पातळीवर आपले अंदाज तपासून पाहण्याची मजा अनुभवायलाच हवी .

           काल परवा एका जुन्या मैत्रिणीला भेटण्याचा योग आला .महाविद्यालयातील भेटीनंतर अनेक दिवसांनी भेटल्याने खूप आठवणी अगदी ढगफुटी व्हावी तशा बरसून आल्या .अचानक बांध फुटावा तशा पसरत गेल्या पौर्णिमेच्या टिपूर उन्हासारख्या …आणि एक अनामिक सुंदर स्पर्धा सुरू झाली आमची दोघांची त्या आठवणींना वेचण्याची ….आपल्या छोट्या छोट्या हातात मिळेल त्या आणि  मिळेल तितक्या क्षणांना साठवून एकमेकांना देण्याची ही स्पर्धा अशीच सुरू राहावी असं मला मनोमन वाटत होतं …या स्पर्धेला अतीव सुंदर आणि निकोप वळण होतं .एकमेकांना फक्त हसवण्यासाठी क्षण वेचण्याची घाई होती .अनेक पूर्वग्रह क्षणात खोटे ठरत होते आणि नवीन मतं बनत होती .दोघांनाही नवे सुर सापडत होते .एकमेकांबद्दलचे गैरसमज दूर होत होते .असे संवाद आयुष्यात नेहमी यायला हवेत .

          इतक्या दिवसांनंतर भेटल्यामुळे स्वभाव आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली होती ,परिपक्व झाली होती .त्यामुळे अनेक विषयांवर माझी मतं बदलत गेली होती .प्रत्येक गोष्टीकडे मी माझ्या स्वतः च्या चष्म्यातून पाहत होतो त्यामुळे तिला माझ्यातला बदल आणि नवेपणा वेगळा भासत होता .ती अजून तशीच होती बालिश थोडीशी बिनधास्त …जुन्या काही आठवणी आठवून अख्ख तोंड लपवत होती .लाजून लाल होत होती .एवढ्याशा हाताने तो सुंदर चेहरा काही केल्या लपत  नव्हता पण प्रयत्न  मात्र ती मनापासून करत होती .हा संवाद माझ्या आकाशाखालच्या आठवणींना काहीसा पहाटेच्या धुक्याचा स्पर्श देत होता .

        बऱ्याच वेळ गप्पा मारून झाल्यावर निरोपाची वेळ यायची पण पुन्हा एखादी आठवण अचानक यायची. पुन्हा तेच  हसणं आणि त्यात रमणं …एक वेळ आली जेव्हा खरोखर निरोप घ्यायचा होता .कुठलीही हुरहूर नव्हती आणि अडकणं नव्हतं ..केवळ नितळ नातं होतं …शेवटी ती म्हणाली “फार बदलला रे अज्या ….वाटलं नव्हतं तू असा असशील …” ही प्रतिक्रिया मला अनपेक्षित होती .पण अनेक सवाल उभे करून गेली .

    आपण का तपासून बघत नाहीत आपले पूर्वग्रह ? आपण का बनवून बसतो चुकीची मते ?  का आपण संवाद साधत नाही ? आकाशाखाली का जगत नाही आपण प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून ?
    तिचा निरोप घेतला आणि मनात प्रश्नांचे सुर रुंजी घालू लागले ….थोडा वेळ ते अनामिक गाणं ऐकलं आणि पावलांनी वेग घेतला  होता आणि तोंडातून उद्गार बाहेर पडले होते “ क्लिअर है बॉस ……”
                    -अजिंक्य

Copyright@ajinkyadandawate

Comments

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...