Skip to main content

Posts

Showing posts from September, 2018

प्रासंगिक 4 :हेडफोन

"काय सारखं कानात खुंट्या ठोकून बसलाय ....!!!."हे वाक्य आपल्या सर्वांच्या कानी आलेच असेल . " कानात खुंट्या ठोकून बसने हे तुला अजिबात शोभत नाही , टुकारपणाची लक्षणे आहेत ही "असं कितीही चिडवलं तरी आम्ही मात्र हेडफोन वापरतो . प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांचे सर्वात मोठे अस्त्र म्हणजे मोबाईल आणि छोटे हत्यार म्हणजे हेडफोन ! गुपचिप खूप वेळ गप्पा मारताना हेडफोन लागतोच ...त्यातून पाठवलेले किसेस ,  गुलाबी गप्पा , सिक्रेट्स सगळं काही हेडफोनच्या भावविश्वाचा एक भागच . अगदी ब्रम्हानंदी टाळी लागते हेडफोन घातले की ! कानाला लावून बोलायच्या डबड्या फोनपासून कानात घालायच्या ब्लुटूथपर्यंत तंत्रज्ञान उत्क्रांत झाले . एक थेंब पाणी गेले तरी बिघडणाऱ्या यंत्रापासून पाण्यात वापरायच्या यंत्रापर्यंत आपण मजल मारली . आपल्या सुखासाठी मानवाची ही अथक धडपड फार रोमहर्षक आहे . विमानात न मावणाऱ्या कॉम्पुटर पासून ते थेट आपल्या घड्याळात आलेल्या कॉम्प्युटरचा हा प्रवास अलीकडच्या काळात प्रचंड झपाट्याने झाला . या सगळ्यात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये हेडफोनशी प्रत्येकाचे अगदी जिव्हाळ्याचे नाते आहे . अगदी ब...

प्रासंगिक 3

विखे पाटील कॅम्पस मध्ये खऱ्या अर्थाने रुजली कॉलेज संस्कृती! कोण ? कुठला ?कसा? यापेक्षा विखे पाटील कॅम्पसमध्ये म्हणजे पाटलांचा ! अशी एक वेगळी ओळख घेऊन या कॅम्पसमध्ये एका नव्या कॉलेज संस्कृतीने जन्म घेतला . जातपात, धर्म आणि उच्च निचतेच्या बेड्या फेकून देत इथल्या तरुणांनी एकत्र येत नवे आदर्श घालून दिले . फार्मसी ,इंजिनिअरिंग , मेडिकल तसेच अग्रीकल्चर असे अनेक अभ्यासक्रम इथे शिकतानाच मुले जीवन जगण्याची कला इथे शिकतात.  या गणेशोत्सवात अत्यंत भक्तिभावाने मुलांनी गणरायाची प्रतिष्ठापना इथे केली आहे . मनात आलं तर लाथ मारील तिथे पाणी काढील अशा पिळदार मनगटांची एक फौज इथे सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर असते . लांबून आलेल्या मुलांचे प्रॉब्लेम सिनिअर मुले समजून घेतात . सुख दुःखात एकमेकांना घरच्यासारखा आधार देतात . एखाद्याच्या शिक्षणाला मदत करणे असो किंवा एखाद्याची शालेय फी देने असो इथला प्रत्येक जण मोकळ्या हाताने मदत करतो आणि यातूनच एक जिव्हाळ्याचे नाते या परिसरासोबत तयार होते . इथे सुमारे 20 गणेश मंडळे असतील . एकमेकांच्या संमतीने रोज एका वेगळ्या ठिकाणी गोडधोड महाप्रसाद असतो . हॉस्टेलची म...

गावपण भाग 4 :ताल आणि बांधारी

ताल आणि बांधारी ताल शब्द नाही पण या शब्दाचा अर्थ हरवतोय . मराठी भाषेत हा शब्द दोन तीन अर्थांनी वापरला जातो . एक ताल संगीतातील आहे . ताल या शब्दाचा दुसरा अर्थ रीत किंवा पद्धत असाही होतो . बेताल म्हणजे ताल नसलेला किंवा अनियंत्रित असा . असो आपण गावपन या सदरात गावामध्ये वापरल्या जाणऱ्या ताल या शब्दविषयी बोलू . याआधी आपण खिळपाट , आरण ,कालवड असे  मराठी भाषेतून गायब होत चाललेले शब्द समजून घेतले . यातल्या खिळपाटाशी साम्य सांगणारा शब्द आहे ताल . खिळपाट हा शब्द नपुसकलिंगी तर ताल हा शब्द स्त्रीलिंगी आहे . दगडाची ओबडधोबड रचलेली जाड भिंत म्हणजे ताल . ताल ही खिळपाटाच्या तुलनेत छोटी पण रुंद असते . पाण्यामुळे जमिनीची झीज होऊ नये म्हणून घातलेला दगडी बांध म्हणजे ताल . खिळपाटाप्रमाणे ताल देखील माती ,सिमेंट अशा गोष्टींशीवाय बांधलेली असते त्यामुळे इथे सुद्धा कसब लागते . पूर्वी डोंगरउतारावर शेती केली जायची तेव्हा माती धरून रहावी आणि पाणी अडवून राहावे यासाठी ताल घातली जायची . यामुळे मृदा आणि जलसंधारण व्हायचे . जमिनीला उतार जास्त असेल तर तो कमी करण्यासाठी ताल घातली जाते . तालीची रुंदी साध...

गावपण भाग 3

 कालवड  नात्यातला हळुवारपणा , भावनिक गुंता , प्रेमाचे आणि वात्सल्याचे सूर घेऊन वाहत असते . गावकऱ्यांचा रांगडा बाज आणि निसर्गाच्या रंगाचा रंगलेला साज घेऊन गावपण प्रवाही होत असते . गावात एकीची उब असते आणि आधुनिकतेचा उहापोह नसतो . जीवाला जीव देण्याची नितळ भावना असते जीवाला जपून माणुसकीचे गोडवे गाणाऱ्यांची संवेदनाहीन परंपरा नसते . माणूसपण जपणाऱ्या प्रथा असतात पण रक्तरंजित घटना घडवणारी पोकळ डोकी नसतात . अर्थात याला अपवाद असतातच . अपवादांची देखील काही अंशी वेगळी मजा असते . त्यावर नंतर कधी बोलू .....   ज्या वेळी शहरात प्रचंड धांदल असते . गडबड असते . आणि जो तो आपले रुटीन उरकण्यात व्यस्त असतो तेव्हा आमच्या गावाकडं मंजुळ आवाजात लहानसे वासरू दावणीतला चारा चघळत आईची वाट बघत असते . दावणीत चारा असतो . पाणी असते पण वासरू आईची मन लावून वाट पाहत असते . त्याला आपण काहीही केले तरी वाट बघण्यापासून परावृत्त करू शकत नाही . त्या दावणीला त्याच्या आईच्या मायेची उब असते . मालकाच्या गावठी पण रांगड्या बाजाचा सुगंध असतो . गोठ्यात छान आणि गोंडस 'कालवड' असेल तर दिवसभर अगदी मंजुळ आवाजात ओरड...

आकाशाखालच्या आठवणी 3

पागल.... आकाशाखाली उभे राहिले की आकाशाखालच्या आठवणी आठवतात .त्या कधी रम्य असतात तर कधी रोमांचकारी. कधी भावनातिरेकाने व्याकूळ झालेल्या असतात तर कधी आनंदाने उन्मत्त !पण आठवणी या भूतकाळ सुद्धा जगायला देणारी जादू असतात !भूतकाळ हा आपल्या हातून  निसटलेला काळ ही व्याख्या मला पटत नाही . भूतकाळ हा न जगलेला काळ असतो. त्या काळातील एकही क्षण आपल्याला आठवत नाही तो काळ म्हणजे भूतकाळ . येथे प्रश्न असा उपस्थित होतो की भविष्यकाळ सुद्धा आपण जगत नाही मग फक्त भूतकाळच न जगलेला काळ कसा? हा खूप बालिश प्रश्न होता.  तर भूतकाळातला एखादा क्षण आपल्याला आठवत नसेल तर त्या काळापुरता आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नव्हता  हे मात्र नक्की! खरं  सांगायचं झालं तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला ,वेळेला ,प्रसंगाला ,संकटाला ,अडथळ्याला, दुःखाला आणि आनंदाला सुद्धा आपण कसे सामोरे जातो, त्या त्या वेळी आपण कसे सादर होतो ? हे महत्त्वाचे . प्रत्येक घटिका आठवण बनून राहिली तर आयुष्य किती सुंदर बनेल नाही ? आयुष्य अनेकदा वळणं घेत असतं.  संथ तर कधी वेगात पुढे जात असतं . काहीवेळा एखाद्या वळणावर कोणी भेटतं किंवा ...

कवितेच्या गावा जावे -6

  .......याला कविता म्हणता येईल . पावसाच्या सरी आणि शब्दांच्या लहरी जेव्हा मिसळतात तेव्हा काही तुषार उडतात .  त्यांना प्रचंड अर्थ, सामर्थ्य असतं . हे तुषार एखाद्या हिरव्यागार तृणपर्णावर मोती बनून साठतात .  त्याला कविता म्हणता येईल ..... रवीने घुसळून घुसळून बनलेला लोण्याचा गोळा जेव्हा चुलीवरच्या ताज्या भाकरीवर वितळतो तेव्हा त्या वितळत जाणाऱ्या लोण्याच्या शांततेला कविता म्हणता येईल .... नितळ डोळ्यांमधून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाला अदृश्य करणारी माती जेव्हा त्या थेंबाला गवसणी घालून जमा होते तेव्हा त्या मातीच्या एकवटण्याला कविता म्हणता येईल.... जन्म घेतलेल्या अंकुराला खुडून कातील पुढे जातो पण अस्तित्व मागे ठेवणाऱ्या धसकटाला कविता म्हणता येईल.... फडफडणाऱ्या कापडाच्या रंगासाठी तडफडणार्‍या जीवांना बघून आंधळेपणाचे सोंग घेतलेल्या डोळ्यांना कविता म्हणता येईल .... बोरीच्या आकडेदार काट्यांनी पकडलेल्या कपड्याला सोडवताना न दिसलेल्या बोराटीच्या स्पर्श तृष्णेला कविता म्हणता येईल ..... वाऱ्यामध्ये फडफडणारे पान आणि त्याच्या शब्द पकडून ठेवण्यासाठीच्या धडपडीला कविता म्हणता य...