Skip to main content

आकाशाखालच्या आठवणी 3


पागल....
आकाशाखाली उभे राहिले की आकाशाखालच्या आठवणी आठवतात .त्या कधी रम्य असतात तर कधी रोमांचकारी. कधी भावनातिरेकाने व्याकूळ झालेल्या असतात तर कधी आनंदाने उन्मत्त !पण आठवणी या भूतकाळ सुद्धा जगायला देणारी जादू असतात !भूतकाळ हा आपल्या हातून  निसटलेला काळ ही व्याख्या मला पटत नाही . भूतकाळ हा न जगलेला काळ असतो. त्या काळातील एकही क्षण आपल्याला आठवत नाही तो काळ म्हणजे भूतकाळ . येथे प्रश्न असा उपस्थित होतो की भविष्यकाळ सुद्धा आपण जगत नाही मग फक्त भूतकाळच न जगलेला काळ कसा? हा खूप बालिश प्रश्न होता.  तर भूतकाळातला एखादा क्षण आपल्याला आठवत नसेल तर त्या काळापुरता आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नव्हता  हे मात्र नक्की! खरं  सांगायचं झालं तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला ,वेळेला ,प्रसंगाला ,संकटाला ,अडथळ्याला, दुःखाला आणि आनंदाला सुद्धा आपण कसे सामोरे जातो, त्या त्या वेळी आपण कसे सादर होतो ? हे महत्त्वाचे . प्रत्येक घटिका आठवण बनून राहिली तर आयुष्य किती सुंदर बनेल नाही ?

आयुष्य अनेकदा वळणं घेत असतं.  संथ तर कधी वेगात पुढे जात असतं . काहीवेळा एखाद्या वळणावर कोणी भेटतं किंवा कोणी भेटल्यावर नवं वळण सुरू होतं. माझं आयुष्य सुद्धा अगदी असच आहे . वळणावळणाचं, तिरपं ,कधी सरळ सुद्धा पण जे आहे ते खूप स्वैर आहे ,स्वच्छंद आहे आणि आझादसुद्धा !

जेव्हा आपण स्वतःसाठी जगत असतो तेव्हा दुसऱ्यांच्या आपल्याबद्दलच्या भावनांचा विचार करत नसतो.  जेव्हा या अवस्थेला आपण पोहोचतो तेव्हा ती एक अनामिक अध्यात्मिक अवस्था असते . मानवी मन हे भावनांचं मायाजाल आहे. जीवन खरं तर भावनांचा परिपाक आहे . एका क्षणात कोणी आपलं आहे ही भावना निर्माण होते कुठलाही संबंध नसताना.  खरंतर निर्मात्याची सर्वात मोठी देणगी आहे 'भावना'!  जीवनाला अर्थ प्रदान करणारे एक सामर्थ्य आहे भावना! तोडणारी आणि जोडणारी जादू आहे भावना!

एवढ्यात एक मुलगी मला जवळची वाटायला लागली .ओळखीची वाटायला लागली .तिचे डोळे साफ बोलायचे, एवढीच तिची अदा !  माझ्या आयुष्याच्या सरळ पायवाटेवर तिचं येणं किंवा माझ्याकडून तिला आणणं हे खूप आल्हाददायक होतं . पहाटेच्या शांत आणि थंडगार धुक्यात  बैलगाडीतून प्रवास करावा तसं !!!
       तिने मला वेडं केलं असं मी म्हणणार नाही कारण मी आधीपासूनच वेडा होतो.  फक्त तिने मला वेडा म्हणायला सुरु केल्यावर मी वेडा असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं होतं.  ती मला पागल म्हणायची याचं मला कधी आश्चर्य वाटलं नाही .
मी सुद्धा मान्य केलं होतं माझं पागलपण . तिच्याशी आयुष्य भेटलं तसं अधिकच बहरून आलं . मोराच्या पिसाचे रंग आता सहज बघायला मिळायचे . डोळे बरच काही बोलत होते. आता आता ते वेगळच काही बोलायला लागले . मला ते सारे काही नवीन होतं.  मला ते वाचता येत नसायचं . सारं काही अपरिचित असतं तेव्हा नजर भिरभिरतेच ! तिचा दोष नसतो तेव्हा! आता ते क्षण पुन्हा आठवले की मी तिच्याशी बोलत राहतो.  तिचा माझा मुक्त संवाद सतत अविरत सुरू असतो . मागच्या बाकावर बसून तिच्या आठवणीमध्ये दंग होऊन ! हा नवा परिपाठ बनला होता . आजही असं झालं आणि मी बोलू लागलो.

- अजिंक्य
Photo by avinash jadhav.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...