पुलावामा हल्ला झाल्यानंतर देश शोकसागरात बुडाला हे विधान झळकले. पण यानंतर देशाच्या हाताला खूप मोठे काम मिळाले . अगदी खूप काही रोजगार मिळाल्यासारखे सगळे त्वेषाने कामाला लागले . व्हाट्सअप्प विद्यापीठ बहरले. ट्विटर तरारले, फेसबुक उजळले आणि सर्वांनी अकलेचे तारे तोडण्याची मोहीम सुरू केली .श्रीदेवींच्या मृत्यूनंतर बाथ टबमध्ये गारव्याला निवांत बसलेली मंडळी अचानक या नव्या रोजगाराच्या संधीचा लाभ उठवण्यासाठी सज्ज झाली . त्यांनी शब्दांचीच शस्त्रे काढली. चांगली परजून घेतली आणि अकलेच्या ताऱ्यांच्या दिशेने सर्वांचा प्रवास सुरु . धीरोदात्तपणे सीमेवर लढणारे जवान शहीद झाले होते , ती कुटुंबे अश्रूंच्या सागरात बुडालेली असताना हातात मेणबत्त्या आणि प्रत्येकाच्या संस्थेचे बॅनर पुढे करून टोळके च्या टोळके पुढे आले . बऱ्याच जणांनी टीव्ही , पेपर आणि व्हाट्सअप्प विद्यापीठाची डिग्री बरोबर आणली असल्याने भाषणे केली . मेणबत्त्या विझून गेल्या पण हातात संघटनेचे बॅनर मात्र तसेच राहिले .बॅनर आणि अध्यक्ष टीव्हीवर दिसण्यासाठी पेड करू लागले . टबमधून उठलेले सगळे थेट हातात मिठाच्या पुड्या घेऊन सैनिकांच्या घरी गेल...
मराठी मातीच्या वैभवासाठी , मानवी मनाच्या भरणपोषणासाठी , संवेदनांची आणि पर्यायाने सृजनाची हळुवार पेरणी करण्यासाठी 'इर्जिक'!... शेतीमातीच्या भावभावना , ज्वारी बाजरीच्या ताटाची ऐट , घुंगरमाळांचा आवाज , नांगराच्या चाकाची किरकिरगितं , गावरान मधाळ बोली , प्राणी पाखरांच्या सुखावणाऱ्या हालचाली सारं काही जपण्यासाठी 'इर्जिक'!....शेतातली भलरी , श्रावणाच्या सरी , लग्नाचे मांडव , लाजरी बुजरी नवरी , वारी आणि वारकरी , मृदंगाचे निनाद , काकडारतीचे रम्य सूर हे सारं काही जपून ठेवण्यासाठीची 'इर्जिक'! ....