Skip to main content

Posts

Showing posts from February, 2019

प्रासंगिक 10 : युद्ध 'पबजी'इतकं सोप्पं आहे का ?

पुलावामा हल्ला झाल्यानंतर देश शोकसागरात बुडाला हे विधान झळकले. पण यानंतर देशाच्या हाताला खूप मोठे काम मिळाले . अगदी खूप काही रोजगार मिळाल्यासारखे सगळे त्वेषाने कामाला लागले . व्हाट्सअप्प विद्यापीठ बहरले. ट्विटर तरारले, फेसबुक उजळले आणि सर्वांनी अकलेचे तारे तोडण्याची मोहीम सुरू केली .श्रीदेवींच्या मृत्यूनंतर बाथ टबमध्ये गारव्याला निवांत बसलेली मंडळी अचानक या नव्या रोजगाराच्या संधीचा लाभ उठवण्यासाठी सज्ज झाली . त्यांनी शब्दांचीच शस्त्रे काढली. चांगली परजून घेतली आणि अकलेच्या ताऱ्यांच्या दिशेने सर्वांचा प्रवास सुरु   . धीरोदात्तपणे सीमेवर लढणारे जवान शहीद झाले होते , ती कुटुंबे अश्रूंच्या सागरात बुडालेली असताना हातात मेणबत्त्या आणि प्रत्येकाच्या संस्थेचे बॅनर पुढे करून टोळके च्या टोळके पुढे आले . बऱ्याच जणांनी टीव्ही , पेपर आणि व्हाट्सअप्प विद्यापीठाची डिग्री बरोबर आणली असल्याने भाषणे केली . मेणबत्त्या विझून गेल्या पण हातात संघटनेचे बॅनर मात्र तसेच राहिले .बॅनर आणि अध्यक्ष टीव्हीवर दिसण्यासाठी पेड करू लागले . टबमधून उठलेले सगळे थेट हातात मिठाच्या पुड्या घेऊन सैनिकांच्या घरी गेल...

गावपण भाग 13 : पातोडा

वेळ सकाळी दहाची . स्वयंपाकघरातून धूर निघत असतो .  e=mc^२ असं लिहिलेल्या डीलक्स या माझ्या छोट्याशा बाईकवर मी घरी पोचतो. बाबा नुकतेच दूध घालून आलेले असतात. त्यांच्याकडे सल्ले घेण्यासाठी आलेली माणसं आणि बायका बसून असतात . बाबा एकेकाला व्यवस्थित मार्गदर्शन करत असतात. मी सरळ घरात घुसणार एवढ्यात आमचा टिल्या येतो. मग काय नुसत्या मिठ्या,उड्या जे जमेल ते करून झाल्यावर मी घरात बॅग ठेवतो आणि स्वयंपाकघरात प्रविष्ट होतो. 20 वर्षाचा धूर खाऊन प्रचंड काळवंडलेली ती खोली आमच्या घराचं हृदय आहे. त्या चुलीतली धग जिवंत ठेवत मायेचा ऊबारा देणारी आमची आई या घराचा आत्मा आहे. तिनी हे सगळं जपलं. वाढवलं. ती छोटीशी चूल आयुष्यभर पुरेल एवढी उबदार माया फेकत असते. विस्तव राख झटकून त्वेषाने फुलत असतो. चूल मूल आणि शेती एवढी मर्यादित असणारी माझी एमकॉम आई पायाच्या दोन अंगठ्यात काटवट(परात) पकडून भाकरी थापण्याच्या तयारीत असते. पत्र्याला पडलेल्या बिळातून उन्हाचे कवडसे थेट फरशीवर पडतात. पण धुरामुळे ते एखाद्या सरळ काडीसारखे दिसतात. असं वाटतं की या काठ्यांनी पत्र्याला आधार दिलाय. मी हातपाय धुवून थोडा बाहेर आलो की एखा...

किस्से दोस्ती के भाग १ : काँक्रीट

आमच्या लै गप्पा नसतात . पण टोमणे मारत मारत कोड्यात बोलायची आदत आहे आम्हाला . तसे अजून आम्ही आदत  गोर्ह्यासारखे खिदळत असतो . मैफिलीत जास्ती काही मोठे विषय नसतात . मोदींची गाजरं , ठाकऱ्यांच्या डरकाळ्या , पवारांच्या कोपरखळ्या , गांधींचं बालपण , पोरींची थेरं आणि नव्या पिढीतल्या येडपटांच्या गोष्टी असे टॉपिक असतात . तुश्या गाडी चालवायला असला की बिनधास्त बाता झोडीत निघतो आम्ही . एकदा पेट्रोल पाण्याचा प्रश्न मिटला की मग डिस्टन्स मॅटर करत नाही . बोलता बोलता तुष्याच्या पर्सनॅलिटीवर विषय गेला . मग काय लै उडवली त्याची . त्याच्या दगडी काळ्या रंगापासून ते शुभ्र टपोऱ्या पांढऱ्या दातांपर्यंत आणि पिकलेल्या येड्यावाकड्या केसांपासून ते टाईट शिवलेल्या पॅन्टीपर्यंत गप्पा झाल्या . मुख्य म्हणजे त्याची उडवायला आम्ही दोघंच होतो ! बोलता बोलता विषय तुष्याच्या दातांवर आला . मग तुश्या म्हणाला की "मी ऑफिसमध्ये यायच्या आधी माझे दात येतेत" या वाक्यावर मी बावचळूस्तर हसलो . तसा तुश्या लै खिलाडू वृत्तीचा आहे . पद्धतशीर राहणे , पाऊण तास लेट पण अगदी टायमावर जाणे हे त्याचे विशेष .  काल परवा रतडगावला एक...

गावपण भाग 12 : जवारी आळाशे पाचूंदा वळ्हई आणि बरंच काही ...

आज आपण बघणार आहोत काही असेच शब्द . सुरुवात करूया ज्वारीच्या ताटापासून . ज्वारीचे ताट म्हणजे ज्वारीचं एक रोप . बाजरीच्या एका बुडखातून चार पाच ताटं फुटतात आणि त्यामुळे कणसं देखील चार पाच येतात . ज्वारीचं तसं नाही . तशी ज्वारी ही पावसाच्या पाण्यावर येते पण सध्या पाणी द्यावं लागतं . नुकतेच उगवलेले ज्वारीचे कोंब आणि त्याची हिरवी लुसलुशीत पाने उंदराच्या कानासारखी दिसतात हे नमूद करायला हवे . जर पाण्याअभावी किंवा खताअभावी ज्वारी वाढली नाही तर त्याला 'बाटूक' म्हणतात .आम्ही कमी उंचीच्या अशक्त मुलामुलींना बाटूक म्हणून चिडवतो ही आमची खासियत . असो जेव्हा कणसाचे दाणे दिसू लागतात तेव्हा ज्वारी निसवली असे म्हणतात . निसवली म्हणजे निबर झाली . पाखरे ज्वारीवर आक्रमण करतात तो हाच काळ . यावेळी गोफण (एक हत्यार ) फिरवून , फटाके वाजवून , बुजगावणे उभारून पाखरांना हाकलून राखण करावी लागते . राखण करण्यासाठी आणि उंचावर उभा राहण्यासाठी चार खांबांचा आधार देऊन एक 'मचाण' उभारलं जातं . त्यावर उभं राहून गोफण फिरवणे सोप्पे जाते . एक काळ असा असतो जेव्हा ज्वारी पूर्ण पक्व नसते आणि कच्ची देखील नस...