वेळ सकाळी दहाची . स्वयंपाकघरातून धूर निघत असतो . e=mc^२ असं लिहिलेल्या डीलक्स या माझ्या छोट्याशा बाईकवर मी घरी पोचतो. बाबा नुकतेच दूध घालून आलेले असतात. त्यांच्याकडे सल्ले घेण्यासाठी आलेली माणसं आणि बायका बसून असतात . बाबा एकेकाला व्यवस्थित मार्गदर्शन करत असतात. मी सरळ घरात घुसणार एवढ्यात आमचा टिल्या येतो. मग काय नुसत्या मिठ्या,उड्या जे जमेल ते करून झाल्यावर मी घरात बॅग ठेवतो आणि स्वयंपाकघरात प्रविष्ट होतो.
20 वर्षाचा धूर खाऊन प्रचंड काळवंडलेली ती खोली आमच्या घराचं हृदय आहे. त्या चुलीतली धग जिवंत ठेवत मायेचा ऊबारा देणारी आमची आई या घराचा आत्मा आहे. तिनी हे सगळं जपलं. वाढवलं. ती छोटीशी चूल आयुष्यभर पुरेल एवढी उबदार माया फेकत असते. विस्तव राख झटकून त्वेषाने फुलत असतो. चूल मूल आणि शेती एवढी मर्यादित असणारी माझी एमकॉम आई पायाच्या दोन अंगठ्यात काटवट(परात) पकडून भाकरी थापण्याच्या तयारीत असते. पत्र्याला पडलेल्या बिळातून उन्हाचे कवडसे थेट फरशीवर पडतात. पण धुरामुळे ते एखाद्या सरळ काडीसारखे दिसतात. असं वाटतं की या काठ्यांनी पत्र्याला आधार दिलाय.
मी हातपाय धुवून थोडा बाहेर आलो की एखादा म्हातारा म्हणतो
"कव्हा आले बुआ?"
मग आपण म्हणायचं "हे काय तुमच्या म्होरच"
"काय मंग बरं चाललंय ना ?"
यानंतर शिक्षणाबद्दल प्रश्न येणार असतो म्हणून त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच फटक्यात द्यायची .
"काय नाय बरहे , थोडं ऱ्हायलं आता.दोन तीन महिने राहिले बघा"
मग त्याच्याशी गप्पा मारता मारता तो विचारतो "आता काय होणार तू"
खरं तर मी काय होणार हे सांगणं अवघड असतं. कारण शिक्षण आणि व्यवहार नौकरी यांचा संबंध नसतो. कशाचीच शाश्वती नसते. खोटं खोटं काहीतरी सांगितल्यावर जरा वेळ मोकळा जातो . एवढ्या वेळेत आईचं काटवट धप धप धप धप वाजत असतं. अधून मधून खरपूस भाजलेल्या भाकरीचा वास येत असतो . बिरबल्याच्या(बैल) घंटीचा आवाज येत असतो .मग तो म्हातारा पुन्हा अनुभवाचे धीरगंभीर बोल ऐकवतो.
"सावलीतली नौकरी बघा.तुमचा बाप लै शिकला.लै दिवस काढले पण काय उपेग झाला नाय. आता तुम्ही आसं करू नका.शेतीत काय नाय रे"
तिथं डोकं बंद पडल्यावर मी उठतो आणि थेट आईसमोर ऊबीला बसतो . आईनी नुकतीच पाणी फिरवून भाकरी पालटलेली असते. ती झपकन तव्यावर पडते आणि चर्रर्रर्रर्रर्र आवाज होतो.
बाभळीच्या लाकडाच्या लालभडक विस्तावाची ऊब, समोर सतत अविरत काम करणारी आई आणि तिच्या माझ्या चेहऱ्यावर ज्वालांचा सतत हलणारा लालभडक प्रकाश असतो.
इकडची तिकडची खुशाली झाल्यावर आई तिच्या मनातल्या गोष्टी सांगते. काल बाबा दवाखान्यात जाऊन आले, काल रात्रभर लाईट नव्हती, गाय माजावर आलीय त्यामुळे गुरांनी लै वैताग दिला, रेशनचे गहू खराब आले, तुझं आधार कार्ड जोडून ये, मोटार खाली सोडावी लागेल, गाय व्यायला झालीय तिला गिऱ्हाईक येईना, विकली नाय गेली तर खायला काय घालायचं?असे तिचे माफक प्रश्न असतात. उन्हात राबून काळा पडलेला तिचा चेहरा , तिची त्वचा , हळूहळू डोकावणाऱ्या सुरकुत्या सारं काही सुन्न करणारं.
धप धप धपधप आवाज करत भाकरी थापणे , तिला व्यवस्थित तव्यावर चढवणे , ती थोडी भाजेपर्यंत नवी भाकरी तयार होणे, मधेच जाळ पुढे सरकवणे , खाली विस्त्यावर टाकलेली भाकरी फिरवणे आणि माझ्याशी बोलणे या सगळ्या क्रिया शिस्तबद्ध सुरू असतात. भाकरी जमणाऱ्या महिला फार कमी आहेत असं माझं मत आहे. भाकरीची माया आणि पातोडा (पापुद्रा) वेगळा झाला तरच भाकरी सक्सेस झाली असे म्हणायचे. माझी आई भाकरीला एक नंबर. शेतकरी महिलांचे हात इतके निबर झालेले असतात की अख्खा विस्त्याचा खडा त्या हातानी उचलून दुसरीकडे ठेवतात हे नमूद करणे गरजेचे आहे.
मग ती गरम गरम बाजरीची भाकरी जुन्या रेल्वे इंजिनासारखी चार पाच ठिकाणाहून वाफा बाहेर फेकत असते. ती पकडायची हळूच ताटात घ्यायची. कधी कधी त्याला विस्तू चिकटून येतो. जर दूध खायचे असेल तर भाकरी अर्धी मोडली की पातोडा कडकडतो. त्याचे बारीक तुकडे पडतात. तो पातोडा मोडण्याचा आवाज मला प्रचंड आवडतो. अजून एक पर्याय म्हणजे संपूर्ण गोल पातोडा व्यवस्थित काढायचा. भाकरीवर तूप टाकायचे आणि पुन्हा कुलूप लावल्यासारखा पातोडा लावून घ्यायचा. ते तूप सगळीकडे पसरते आणि एक सुगंध येतो. त्या घमघमाटात पुन्हा एकदा पातोडा उघडायचा आणि त्यावर मीठ पेरायचे. जनाब ऐसा खाना अगर कोई खा ले तो भला जिंदगी मे और क्या चाहीये?
भाकरी ही उन्हाळ्यातल्या रात्रीसारखी असते आणि पातोडा शिवारभर पसरलेल्या चांदण्यासारखा ! रात्र हवीहवीशी वाटते , रात्रीचा गार वारा हवाहवासा वाटतो पण चांदणं पडल्यावर सगळं शिवार आबादानी होतं ! स्वर्गीय वाटतं. जिवंत असल्यासारखं वाटतं. भाकरीपासून वेगळं निघणं हा पातोड्याला स्वभावच. कदाचित वेगळं निघून त्याने निर्माण केलेल्या स्वतंत्र खरपूस अस्तित्वामुळे त्याची वेगळी किंमत आहे. कधी कधी पातोडा काही केल्या निघत नाही. तेव्हा चंद्र पृथ्वीवर रुसलाय असं वाटतं!
ज्वारीच्या भाकरीत मजा नाय असं मानणारा एक मोठा वर्ग आहे .मीही त्यातलाच . बाजरीची भाकरी आणि ताक हे तर लै भारी इक्वेशन आहे असे बाबा म्हणतात पण मी ते ट्राय करत नाही. बाकी पातोडा भिस्किटासारखा खात मी बराच वेळ आईशी गप्पा मारतो. तिचं मन मोकळं करायला कोणीच नसल्यामुळे मी गेल्यावर ती आनंदून जाते. मी फार मोठा कोणीतरी होईल असा तिचा विश्वास कायम असतो. ही मोठी जबाबदारी वाटते.
आता दूध खाताना भाकरीचा पातोडा लगेच मऊ होत नाही. त्याचा कडकपणा तसाच असतो. जर का घास घेताना पातोडा उभा झाला तर टाळूचे कातडे काढणार हे नक्की! आणि जर भाकरीची गरमागरम माया टाळूला चिकटली तर टाळू इतका भाजणार की आठवडाभर आठवण जाणार नाही.
असो ज्यांना पातोडा मिळत नाही असे लोक पिज्जा खाऊन स्टेटस ठेवा. पाणीपुरी खाऊन फोटो टाका . आमच्या इकडे पातोडा खाताना फोटो काढायचं ध्यान होत नाय. कारण ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते!!
-aj
20 वर्षाचा धूर खाऊन प्रचंड काळवंडलेली ती खोली आमच्या घराचं हृदय आहे. त्या चुलीतली धग जिवंत ठेवत मायेचा ऊबारा देणारी आमची आई या घराचा आत्मा आहे. तिनी हे सगळं जपलं. वाढवलं. ती छोटीशी चूल आयुष्यभर पुरेल एवढी उबदार माया फेकत असते. विस्तव राख झटकून त्वेषाने फुलत असतो. चूल मूल आणि शेती एवढी मर्यादित असणारी माझी एमकॉम आई पायाच्या दोन अंगठ्यात काटवट(परात) पकडून भाकरी थापण्याच्या तयारीत असते. पत्र्याला पडलेल्या बिळातून उन्हाचे कवडसे थेट फरशीवर पडतात. पण धुरामुळे ते एखाद्या सरळ काडीसारखे दिसतात. असं वाटतं की या काठ्यांनी पत्र्याला आधार दिलाय.
मी हातपाय धुवून थोडा बाहेर आलो की एखादा म्हातारा म्हणतो
"कव्हा आले बुआ?"
मग आपण म्हणायचं "हे काय तुमच्या म्होरच"
"काय मंग बरं चाललंय ना ?"
यानंतर शिक्षणाबद्दल प्रश्न येणार असतो म्हणून त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच फटक्यात द्यायची .
"काय नाय बरहे , थोडं ऱ्हायलं आता.दोन तीन महिने राहिले बघा"
मग त्याच्याशी गप्पा मारता मारता तो विचारतो "आता काय होणार तू"
खरं तर मी काय होणार हे सांगणं अवघड असतं. कारण शिक्षण आणि व्यवहार नौकरी यांचा संबंध नसतो. कशाचीच शाश्वती नसते. खोटं खोटं काहीतरी सांगितल्यावर जरा वेळ मोकळा जातो . एवढ्या वेळेत आईचं काटवट धप धप धप धप वाजत असतं. अधून मधून खरपूस भाजलेल्या भाकरीचा वास येत असतो . बिरबल्याच्या(बैल) घंटीचा आवाज येत असतो .मग तो म्हातारा पुन्हा अनुभवाचे धीरगंभीर बोल ऐकवतो.
"सावलीतली नौकरी बघा.तुमचा बाप लै शिकला.लै दिवस काढले पण काय उपेग झाला नाय. आता तुम्ही आसं करू नका.शेतीत काय नाय रे"
तिथं डोकं बंद पडल्यावर मी उठतो आणि थेट आईसमोर ऊबीला बसतो . आईनी नुकतीच पाणी फिरवून भाकरी पालटलेली असते. ती झपकन तव्यावर पडते आणि चर्रर्रर्रर्रर्र आवाज होतो.
बाभळीच्या लाकडाच्या लालभडक विस्तावाची ऊब, समोर सतत अविरत काम करणारी आई आणि तिच्या माझ्या चेहऱ्यावर ज्वालांचा सतत हलणारा लालभडक प्रकाश असतो.
इकडची तिकडची खुशाली झाल्यावर आई तिच्या मनातल्या गोष्टी सांगते. काल बाबा दवाखान्यात जाऊन आले, काल रात्रभर लाईट नव्हती, गाय माजावर आलीय त्यामुळे गुरांनी लै वैताग दिला, रेशनचे गहू खराब आले, तुझं आधार कार्ड जोडून ये, मोटार खाली सोडावी लागेल, गाय व्यायला झालीय तिला गिऱ्हाईक येईना, विकली नाय गेली तर खायला काय घालायचं?असे तिचे माफक प्रश्न असतात. उन्हात राबून काळा पडलेला तिचा चेहरा , तिची त्वचा , हळूहळू डोकावणाऱ्या सुरकुत्या सारं काही सुन्न करणारं.
धप धप धपधप आवाज करत भाकरी थापणे , तिला व्यवस्थित तव्यावर चढवणे , ती थोडी भाजेपर्यंत नवी भाकरी तयार होणे, मधेच जाळ पुढे सरकवणे , खाली विस्त्यावर टाकलेली भाकरी फिरवणे आणि माझ्याशी बोलणे या सगळ्या क्रिया शिस्तबद्ध सुरू असतात. भाकरी जमणाऱ्या महिला फार कमी आहेत असं माझं मत आहे. भाकरीची माया आणि पातोडा (पापुद्रा) वेगळा झाला तरच भाकरी सक्सेस झाली असे म्हणायचे. माझी आई भाकरीला एक नंबर. शेतकरी महिलांचे हात इतके निबर झालेले असतात की अख्खा विस्त्याचा खडा त्या हातानी उचलून दुसरीकडे ठेवतात हे नमूद करणे गरजेचे आहे.
मग ती गरम गरम बाजरीची भाकरी जुन्या रेल्वे इंजिनासारखी चार पाच ठिकाणाहून वाफा बाहेर फेकत असते. ती पकडायची हळूच ताटात घ्यायची. कधी कधी त्याला विस्तू चिकटून येतो. जर दूध खायचे असेल तर भाकरी अर्धी मोडली की पातोडा कडकडतो. त्याचे बारीक तुकडे पडतात. तो पातोडा मोडण्याचा आवाज मला प्रचंड आवडतो. अजून एक पर्याय म्हणजे संपूर्ण गोल पातोडा व्यवस्थित काढायचा. भाकरीवर तूप टाकायचे आणि पुन्हा कुलूप लावल्यासारखा पातोडा लावून घ्यायचा. ते तूप सगळीकडे पसरते आणि एक सुगंध येतो. त्या घमघमाटात पुन्हा एकदा पातोडा उघडायचा आणि त्यावर मीठ पेरायचे. जनाब ऐसा खाना अगर कोई खा ले तो भला जिंदगी मे और क्या चाहीये?
भाकरी ही उन्हाळ्यातल्या रात्रीसारखी असते आणि पातोडा शिवारभर पसरलेल्या चांदण्यासारखा ! रात्र हवीहवीशी वाटते , रात्रीचा गार वारा हवाहवासा वाटतो पण चांदणं पडल्यावर सगळं शिवार आबादानी होतं ! स्वर्गीय वाटतं. जिवंत असल्यासारखं वाटतं. भाकरीपासून वेगळं निघणं हा पातोड्याला स्वभावच. कदाचित वेगळं निघून त्याने निर्माण केलेल्या स्वतंत्र खरपूस अस्तित्वामुळे त्याची वेगळी किंमत आहे. कधी कधी पातोडा काही केल्या निघत नाही. तेव्हा चंद्र पृथ्वीवर रुसलाय असं वाटतं!
ज्वारीच्या भाकरीत मजा नाय असं मानणारा एक मोठा वर्ग आहे .मीही त्यातलाच . बाजरीची भाकरी आणि ताक हे तर लै भारी इक्वेशन आहे असे बाबा म्हणतात पण मी ते ट्राय करत नाही. बाकी पातोडा भिस्किटासारखा खात मी बराच वेळ आईशी गप्पा मारतो. तिचं मन मोकळं करायला कोणीच नसल्यामुळे मी गेल्यावर ती आनंदून जाते. मी फार मोठा कोणीतरी होईल असा तिचा विश्वास कायम असतो. ही मोठी जबाबदारी वाटते.
आता दूध खाताना भाकरीचा पातोडा लगेच मऊ होत नाही. त्याचा कडकपणा तसाच असतो. जर का घास घेताना पातोडा उभा झाला तर टाळूचे कातडे काढणार हे नक्की! आणि जर भाकरीची गरमागरम माया टाळूला चिकटली तर टाळू इतका भाजणार की आठवडाभर आठवण जाणार नाही.
असो ज्यांना पातोडा मिळत नाही असे लोक पिज्जा खाऊन स्टेटस ठेवा. पाणीपुरी खाऊन फोटो टाका . आमच्या इकडे पातोडा खाताना फोटो काढायचं ध्यान होत नाय. कारण ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते!!
-aj
Comments
Post a Comment