Skip to main content

Posts

Showing posts from 2020

गावगारवा भाग 2: गाडीवाट

ना इथे विज्ञानाचे धरबंध असतात ना धार्मिकतेचा उन्माद, इथे फक्त हरेकाला सुखावणाऱ्या परंपरा, चालीरीती वाहत असतात. इथलं जीवन निसर्गाशी घट्ट बांधलेलं असतं. निसर्गावर अवलंबून असलं तरी परस्परपूरक असतं. प्रत्येक ऋतूनुसार इथल्या संस्कृतीचा नवा थाट असतो. साज असतो. आज शेतीमध्ये आधुनिकतेने अतिक्रमण केलं असलं तरी जुनी संस्कृती झाकून राहिलेली नाही. ती कधीतरी पुन्हा उगवते. जुने संदर्भ पुन्हा जागे होतात. त्यात भयानक दुःखही असतं पण माणूस नेहमी जुन्या गोष्टींमध्ये फार सुख होतं असं म्हणतो. गतवैभवाच्या स्वप्नांमध्ये रमतो. कितीही पुढे गेलो तरी रस्ता संपत नाही, नवीन वाटा खुणावतच राहतात याचा शीण येत असावा माणसाला! म्हणून तो गतवैभवाच्या स्वप्नांनी स्वतःच्या हृदयाच्या कप्प्यात आनंदाचे प्रवाह साठवत असतो. पूर्वी बैलगाडीने वऱ्हाड नेलं जायचं. बाजार, व्यापार देखील बैलगाडीनेच चालायचा. लांबचा प्रवास देखील बैलगाडीनेच. अगदी मोटारींच्या शोधानंतरसुद्धा काही काळ या बैलगाडीने रस्त्यांवर राज्य केलंय. मोटारी सामान्य माणसाच्या हातात येईपर्यंत बैलगाड्यांनी फार अंतर कापलं होतं. गावापासून दूर व्यापाराला, प्रवासाला जातान...

गावगारवा भाग 1: बोराटी

असं म्हणतात दिवाळीचा दिवा लागला की चारा वाळायला सुरुवात होते. एकदा का डोंगराचा चारा वाळला की कुसळांचं मायावी राज्य सुरू होतं. वातावरणात थंडी भरलेली असते. हात पाय कोरडे पडलेले असतात. त्यात दिवाळीदरम्यान लावलेल्या तेलामुळे हातावर फुफाटा बसतो आणि हात पाय उकललेले असतात. ऊन असलं तरी दिवसभर थंडी वाजत असते. अशा वेळी कूसळं असली तरी फुल कपडे घालून गुरं वळायला जावं लागतं. हात दोन हात लांब काठी , कातड्याच्या चांभाराकडून बांधलेल्या मोक्कार जड निबर वहाणा, डोक्याला टॉवेल अशा अवतारात आम्ही निघायचो बोरं खायला. गुरं कसणात लावून द्यायचे आन एक एक बोर पार झोडून खायची. सुरुवातीला कुढंमूढं एखादं अर्ध बोर पीकलेलं असतं. तेव्हा मात्र काठीने फक्त तेवढंच पाडायचं.  ते बोर चघळून चघळून पार गिठुळी मोकळी करायची. मग ती गिठुळी फोडून त्यात शेंगदाण्यासारख्या दोन पाकळ्या निघत्यात त्या खायच्या असं आम्ही दिवसभर भटकायचो. बोराटीत एकदा हात घातला की 100 टक्के काटे घुसणार असतात. बोरातीचे काटे वाघ नखांसारखे असतात. घुसले की फाडुनच बाहेर येतेत. फुल बाह्यांचा शर्ट असेल तर दोरे उधडून निघतात. हळू हळू सगळ्या बोरी पिकायला...

करोना, law of survival of fittest आणि वर्गसंघर्ष

कोरोनाच्या निमित्ताने देशभर एक मोठं संकट घोंगावत असताना फार वेळ मिळाला आहे प्रत्येकाला आत्मशोध घेण्यासाठी. अर्थात किती जण हा वेळ आत्मशोधासाठी वापरताहेत हा शोधाचाच विषय. असो. मुळात हे संकट भारत देश अशिक्षित, अडाणी, अंधश्रद्धा युक्त, गरीब आणि भयानक आर्थिक विषमता असलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांचा एकत्रितपणे परिणाम या संकटाची दाहकता वाढवतो. सगळीकडे कर्फ्यु असताना सायकलवर गावाकडे परत चाललेलं एक तरुण मजूर जोडपं एका वृत्तवाहिणीवर दिसलं. त्यात त्यांची एक मुलगी त्या स्त्रीकडे मागे कडेवर होती आणि एक बाळ पुढे सायकलच्या नळीवर बसलेलं. झोपी गेलेल्या त्या बाळाने आपलं मुंडकं हँडलवर टेकवलं होतं. त्याला हादरे बसू नये म्हणून, खड्ड्यामुळे आदळू नये म्हणून त्याचा बाप त्या डोक्याखाली हँडलवर केवळ एक टॉवेलची घडी ठेऊ शकत होता. त्याकडे हजार अकराशे किलोमीटर सायकलवर प्रवास करण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता. माणसाने स्वतःच्या सुखासाठी सुरू केलेला खेळ आता असा माणसाच्या जीवावर बेततो आहे. यंत्र बनून स्पर्धेत फिरण्याशिवाय आता दुसरा मार्ग उरलेला नाही. गेलं एक वर्ष भारतावर आणि काही अंशी जगावर आर्थिक मंदीचं सावट आहे. ...

अखिल भारतीय तलवार घाला पण इंजेक्शन नको संघटना  !!

  अखिल भारतीय तलवार घाला पण इंजेक्शन नको या संघटनेचे प्रतिनिधित्व करू शकतो एवढा मी इंजेक्शनला भितो . झालं असं कि मी सातवीत असताना गुढग्यावर बेंड आलं . आता त्याला गावाकडे फिस्कं असं म्हणतात.  जवळजवळ तीन महिने म्हणजे दिवाळी पासून ते थेट मकरसंक्रांतीपर्यंत ते बरं झालं नाही . मी आपलं रोज ते बेंड तसंच वागवायचं . दवाखान्याचं  नाव जरी कोणी काढलं तरी मी त्या व्यक्तीपासून घाबरून राहायचो. मला कोणीही दवाखान्यात नेऊ शकलं नाही , तीन महिने हे शीतयुद्ध सुरु होतं . गावात एखादा सोडलेला बैल असतो किंवा सोडलेली गाय असते ती कधीच कुणाच्या हाती लागत नाही तास मी अगदी जपून रहायचो . गावात बजरंग करंजुलेचा छोटा दवाखाना होता पण मी तिकडं कधीच गेलो नव्हतो . त्याआधी मी कधीच इंजेक्शन घेतलेलं नव्हतं . लोक हातात इंजेक्शन घेतात म्हणजे दंडात हे मला माहित होतं त्यासाठी मी १०-२० टक्के तयार होतो , तसा ऑप्शन मला घरचे द्यायचे पण मी त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नव्हतो . मला माहित होतं कि हे लोक मला नेणार आणि मागून सुई घालणार !! हे सुई प्रकरण दिवसभर माझ्या डोक्यात असायचं . त्यात मी पाठीवर पिशवी ...