Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

व्यक्तिविशेष भाग 1

गोड आवाजाचा धनी प्रसाद बेडेकर एखाद्या कार्यक्रमात प्रसाद बेडेकर व्यक्ती असली  की कार्यक्रम रंगणार ,मजा येणार ,करमून जाणार हे नक्की .देवाने या माणसाला गोड आवाजचं आणि गोड बोलण्याचं घसघशीत अनुदान दिलंय की काय असं वाटायला लागतं .हा माणूस दिसतो गोड, बोलतो गोड आणि आहे देखील गोड. नगरच्या रंगभूमीवर ,प्रत्येक व्यासपीठावर प्रसाद सरांनी यावं आणि जिंकून निघून जावं हे आता नित्याचच झालंय.                                   माझा आणि या कलाकाराचा फार काही सामना झाला नाही .आमची तोंडओळख आहे .पण त्यांना बघू न त्यांच्यासारखं बनण्याची उर्मी माझ्यात आहे आणि मी यशस्वी देखील होतोय . हा गोड आवाजाचा धनी आपल्यातीलच कोणीतरी आहे असं वाटायला लागतो .कार्यक्रमात जान आणत मेलेले कार्यक्रम जिवंत करण्याची जादू साधलेला एक उमदा कलाकार म्हणजे प्रसाद बेडेकर . श्रोत्याच्या हृदयाला त्याच्या नकळत हात घालण्याची हातोटी साधलेला हा जादूगार आहे .भलेभले ल...

गावपण भाग 1: मळ्यात पुस्तकवाचनाचा स्वर्गीय अनुभव

गावपण : मळ्यात पुस्तकवाचनाचा स्वर्गीय अनुभव धुक्याने भरलेली वाट चालताना ओढ्याच्या खळखळ आवाज यावा आणि त्या आवाजाच्या शोधात एका मोठ्या दरीचा शोध लागावा असाच काहीसा अनुभव असतो मळ्यात पुस्तकवाचनाचा . रानात निसर्गाच्या कुशीत ,सुगंधी वाऱ्याच्या मंजुळ लहरींचा अनुभव घेत वाचन करणे म्हणजे समाधी अवस्थेची अनुभूतीच. प्रत्येक गोष्ट अनुकूल असते आणि विश्वाच्या अस्तित्वाचे गूढ उलगडत ब्रह्मज्ञानाचे महाद्वार उघडावे तसा सगळा परिसर अगदी मनमोहक असतो . एका दिवसात एक पुस्तक वाचून संपवण्याची हिंमत मी दाखवू शकतो ती  या निसर्गाच्या प्रेमळ असण्यानेच.  . केवळ निसर्ग आणि आजूबाजूला पक्षांचा गुंजारव ...अगदी छोट्या पक्षापासून घारीच्या झेपेपर्यंत सगळ्या गोष्टी बघायला मिळतात . ऊन सावलीचा स्वतंत्र खेळ सुरू असतो आणि खारुताईचा काहीतरी उद्योग सुरू असतो . प्रत्येक गोष्टीचा वास घेऊन ठेवण्याची कुत्र्याची घाई सुरू असते . गाय भराभर गवत खात असते तर वासरांचे हुंदडणे सुरू असते . शेळीचा आणि करडांचा आवाज हळूच येत असतो  . वारा झाडांमधून जाताना थोडीफार पानं गळतात ,ती हळूच जमिनीवर विसावत असतात तर फांद्यांचा ...

प्रासंगिक भाग 4

गोडवा भारतीय सणांचा :वटपौर्णिमा भारतीय संस्कृती आपल्याला निसर्गमय करून टाकते .निसर्गाकडे नव्या नजरेने बघायला शिकवते . याच अनुषंगाने भारतीय सण उत्सव साजरे होतात . अगदी प्रत्येक सणाचा संबंध ऋतुमानानुसार आपल्या आरोग्याशी देखील जोडलेला आढळून येतो . असाच प्रत्येक स्त्रीच्या भावविश्वातला महत्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते . वडाच्या झाडाची पूजा यानिमित्ताने महिला मंडळी बांधतात . या सणाच्या निमित्ताने सगळ्या स्त्रिया एकत्र येतात ,हितगुज करतात आणि यातून नवे ऋणानुबंध वृद्धिंगत होतात . भारतीय संस्कृतीचा केवढा हा गोडवा !          जिथे श्रद्धेचा अतिरेक होतो तिथे अंधश्रद्धेचा उगम झालाच म्हणून समजा . मूळ उद्देशापासून जेव्हा आपण दूर जातो तेव्हा मात्र अंधश्रद्धेकडे झुकण्याचा धोका जास्त असतो . वटपौर्णिमा देखील अनेक अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडली आहे . या चुकीच्या समजुती दूर सारून जर मूळ उद्देश समजावून घेतला तर हे सण आपल्या आयुष्यातील सुंदर काळ असतील . या सणांच्या निमित्ताने महिला गावातल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जमतात . तिथे हळद कुंकू वाहून म...

चंद्रशेखर आझाद एक उमदा राष्ट्रभक्त

एखाद्या व्यायामशाळेत आपण एक फोटो नेहमी बघतो हातात घड्याळ ,भारदस्त छाती, पिळदार दंड असलेला तो क्रांतिकारक म्हणजे चंद्रशेखर आझाद.  क्रांतिकारक म्हणून  प्रसिद्ध असलेल्या चंद्रशेखर आझाद यांचे  आयुष्य एक संघर्षमय जीवनपट आहे त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकताना प्रत्येक तरुणाचं रक्त सळसळून उठते.  मुळात त्यांचे  नाव चंद्रशेखर आझाद नसून चंद्रशेखर सीताराम तिवारी असे आहे . त्यांच्या आईचे नाव जगरानी देवी असे होते .  आझाद यांचा जन्म मध्यप्रदेशातील बावरा गावात 23 जुलै 1606 मध्ये  झाला . हे गाव आदिवासीबहुल भागात मोडते.इथे जंगलात त्यांनी आदिवासी मुलांबरोबर खेळ खेळले. धनुष्यबाण चालवणे ,छोटी मोठी हत्यारे वापराने यात ते तरबेज झाले . याबरोबर त्यांनी आपले शरीर चांगले कमावले .आझाद यांना पुढे काशी येथे संस्कृत पाठशाळेत पाठवण्यात आलं . त्या वेळी काशी मात्र क्रांतिकाऱ्यांचे केंद्र होते . इथे त्यांची ओळख अनेक क्रांतिकाऱ्यांशी झाली आणि देशासाठी काहीतरी करण्याची त्यांची उर्मी जागी झाली . त्यांच्या आझाद या नावाविषयी अनेक कहाण्या सांगितल्या जातात लहानपणापासूनच अत्यंत वैचार...

कवितेच्या गावा जावे -२

एक तू आहेस दोस्ता ,जिंदगी समशान होती जागला स्वाभिमान दोस्ता जिंदगी अपमान होती... पत्थरांना तोंड द्याया उघडी आहे आज छाती चिरन्या अंधार माझी जिंदगी तेव्हा म्यान होती .... एक तू आलास इकडे दुश्मनांनी बदलली नीती तो शिव्यांचा भडिमार अन जिंदगी गुमनाम होती ... आज मी चालतो अन समोर झडतात मुजरे रथाचे निखळले चाक अन जिंदगी गतप्राण होती ... वाट होती थेट होती सावली घनदाट होती हरवले होते धुके अन जिंदगी निष्प्राण होती ... जोडले उभारले तू राज्य हे माझे तुझे काळ होता थांबला अन जिंदगी सामान होती ... आजची गती ,आज ती प्रीती ,आज बघ फुटले धुमारे पराभूत त्या रात्री होत्या एकतर्फी अजान होती ...                   -ajinkya

लोकमान्य टिळक एक जहाल झंजावात….

एकीकडे 1857 नंतर भारतात पुन्हा सशस्त्र क्रांती होऊ नये यासाठी इंग्रज सरकार दक्षता घेत होते तर दुसरीकडे पुन्हा याच इंग्रज सरकारला सशस्त्र आणि जहाल क्रांतीच्या माध्यमातून टक्कर द्यायला अनेक क्रांतिकारक सज्ज झाले होते.  त्यापैकीच एक 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' .समाजसुधारक, राष्ट्रीय नेता ,पत्रकार, संस्कृतज्ञ तसेच गणित, खगोलविज्ञान यांचा गाढा अभ्यासक असलेले लोकमान्य टिळक जनमानसात प्रसिद्ध असलेले नेता होते  . त्यांनी राबवलेले   उपक्रम जनमानसात रुजले आणि एक प्रबळ राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हा त्यांचा नारा सबंध भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत महामंत्र बनून गेला . या नाऱ्यामधून प्रत्येकाला आपल्या  हक्कांची जाणीव होत होती आणि ते हक्क मिळवण्याचा अधिकार आहे अशी उर्मी त्यांच्यामध्ये निर्माण होत होती .याचाच परिपाक म्हणून अनेक तरुण अबाल वृद्ध कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीत जोडले गेले. त्यांच्या योगानाबद्दल त्यांनालोकमान्य ही पदवी दिली गेली.  रत्नागिरीमध्ये चिखली या गावात त्यांचा जन्म झाला . त...