Skip to main content

व्यक्तिविशेष भाग 1


गोड आवाजाचा धनी प्रसाद बेडेकर

एखाद्या कार्यक्रमात प्रसाद बेडेकर व्यक्ती असली  की कार्यक्रम रंगणार ,मजा येणार ,करमून जाणार हे नक्की .देवाने या माणसाला गोड आवाजचं आणि गोड बोलण्याचं घसघशीत अनुदान दिलंय की काय असं वाटायला लागतं .हा माणूस दिसतो गोड, बोलतो गोड आणि आहे देखील गोड. नगरच्या रंगभूमीवर ,प्रत्येक व्यासपीठावर प्रसाद सरांनी यावं आणि जिंकून निघून जावं हे आता नित्याचच झालंय. 


                                 माझा आणि या कलाकाराचा फार काही सामना झाला नाही .आमची तोंडओळख आहे .पण त्यांना बघू न त्यांच्यासारखं बनण्याची उर्मी माझ्यात आहे आणि मी यशस्वी देखील होतोय . हा गोड आवाजाचा धनी आपल्यातीलच कोणीतरी आहे असं वाटायला लागतो .कार्यक्रमात जान आणत मेलेले कार्यक्रम जिवंत करण्याची जादू साधलेला एक उमदा कलाकार म्हणजे प्रसाद बेडेकर . श्रोत्याच्या हृदयाला त्याच्या नकळत हात घालण्याची हातोटी साधलेला हा जादूगार आहे .भलेभले लोक तोंडात बोटे घालतील इतका हजरजबाबी , प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष देणारा ज्ञानपिपासू ,चिकित्सक बालमन जागे ठेवत तारुण्याच्या व्याख्या बदलणारा अवलिया ,प्रखर तल्लख बुद्धिमत्तेच्या बळावर व्यासपीठावर वैचारिक घमासान घडवून आणणारा हा निवेदक आपल्या खासगी आयुष्यातही प्रचंड दिलखुलास आहे .

                 रंगभूमीवर काम करताना कलाकार म्हणून त्यांची प्रतिभा दिसली आणि कौतुकाची थाप पाठीवर घेत प्रसाद आज नगरचा आवाज बनलेत. .कार्यक्रम कुठलाही असो हा पठ्ठा मात्र गाजवणारच .व्यासपिठाशी काहीतरी गूढ नातं असावं त्यांचं .विलक्षण विनम्र भासणारा, टवटवीत गुलछडीच्या फुलासारखा दिसणारा हा निवेदक माझी प्रेरणा आहे .यामागे त्यांचे कष्ट आहेत .आवाजावर,भाषेवर आणि सदारीकरणावर  केलेले त्यांचे काम आहे .साहित्याचा ,संस्कृतीचा त्यांचा व्यासंग आहे . समाजमनाचा अभ्यास आहे .प्रचंड कष्टातून साध्य केलेली ही कला जपताना प्रसाद सर तिला योग्य तो न्याय देतात .
वडील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत ,अभ्यासक आणि वक्ते आहेत .त्यांचं बाळकडू मिळालं ,संस्कार मिळत गेले आणि विनम्र भावाने संकटांना आणि यशालादेखील सामोरे जाण्याची शिकवण मिळली .स्वाभिमानाने जगण्याचा अर्थ समजला .हेच आशीर्वाद घेऊन सुरू झालेली घौडदौड आता अनेकांची प्रेरणा आहे .
‌प्रसाद सर आपल्या एकूणच कर्तुत्वाला मानाचा मुजरा ......


‌आपला चाहता ,अजिंक्य

Comments

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 12 : जवारी आळाशे पाचूंदा वळ्हई आणि बरंच काही ...

आज आपण बघणार आहोत काही असेच शब्द . सुरुवात करूया ज्वारीच्या ताटापासून . ज्वारीचे ताट म्हणजे ज्वारीचं एक रोप . बाजरीच्या एका बुडखातून चार पाच ताटं फुटतात आणि त्यामुळे कणसं देखील चार पाच येतात . ज्वारीचं तसं नाही . तशी ज्वारी ही पावसाच्या पाण्यावर येते पण सध्या पाणी द्यावं लागतं . नुकतेच उगवलेले ज्वारीचे कोंब आणि त्याची हिरवी लुसलुशीत पाने उंदराच्या कानासारखी दिसतात हे नमूद करायला हवे . जर पाण्याअभावी किंवा खताअभावी ज्वारी वाढली नाही तर त्याला 'बाटूक' म्हणतात .आम्ही कमी उंचीच्या अशक्त मुलामुलींना बाटूक म्हणून चिडवतो ही आमची खासियत . असो जेव्हा कणसाचे दाणे दिसू लागतात तेव्हा ज्वारी निसवली असे म्हणतात . निसवली म्हणजे निबर झाली . पाखरे ज्वारीवर आक्रमण करतात तो हाच काळ . यावेळी गोफण (एक हत्यार ) फिरवून , फटाके वाजवून , बुजगावणे उभारून पाखरांना हाकलून राखण करावी लागते . राखण करण्यासाठी आणि उंचावर उभा राहण्यासाठी चार खांबांचा आधार देऊन एक 'मचाण' उभारलं जातं . त्यावर उभं राहून गोफण फिरवणे सोप्पे जाते . एक काळ असा असतो जेव्हा ज्वारी पूर्ण पक्व नसते आणि कच्ची देखील नस...