स्टुपिड …
मला माझ्या जाणत्या वयापासून आव्हानांनी खचाखच भरलेल्या आणि बिनधास्त बावळट जीवनांचा हेवा वाटायचा .आपणही ही जीवन जगावं असं मनोमन वाटायचं .आव्हानांना पोलादी हातांनी आणि वज्रमुठींनी फोडून काढावं असा वाटायचं .छातीतल्या धगधगणाऱ्या निखाऱ्याने संकटांना होरपळून काढावं वाटायचं .श्वासांच्या वादळाने त्या आव्हाणांची फोलपटांसारखी अवस्था करावी वाटते .कधी वाटतं इतकं बावळट व्हावं की आव्हानांनीच आपला पाठलाग करणं सोडून द्यावं .इतकं बेफिकीर व्हावं की अडथळ्यांनाच माझा हेवा वाटावा .जरी अडखळलो तरी ,जरी धडपडलो तरी त्याची काहीही तमा बाळगू नये . मान्यच करू नये की हा माझा अपमान आहे .मान्यच करू नये की ही माझी हार आहे .किंबहुना कळूच नये मला की हार काय आणि जीत काय ?इतकं स्वतंत्र व्हावं की एखाद्या आसमानाचा तारा व्हावं ,इतकं दिशाहीन व्हावं की आभाळाचा छोटासा तुकडा …पण तुटलेल्या पतंगाचं स्वातंत्र्य मला आवडत नसायचं कारण आयुष्याला काही अर्थ असावा उद्दिष्ट असावीत ही मात्र माझ्या विचारांमधली एक पक्की बाजू होती .कशी तयार झाली होती माहीत नाही .
यातलं आव्हानांना स्वीकारून एखाद्या राकट योध्यासारखं पुढं निघून जावं या आयुष्याच्या एका सरधोपट मार्गावर मी चालत होतो .संकटं ही मेजवानी वाटू लागली होती .आव्हाणं स्वीकारण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा आणि त्या यशाच्या चढलेल्या नशेत वावरण्याचा माझ्या जीवनपद्धतीचा एक ढंग बनला होता .माझ्या अजिंक्य नावाला अजिंक्य ठेवणारी ही एक सोची समझी चाल …
ही राकट शौर्य सुद्धा मला नीरस वाटायला लागलं .त्या यशाची ,विजयाची नशा आता चढत नव्हती .ते सोहळे आता बेचव वाटू लागले .त्या टाळ्या ,तो जयजयकार ,त्या आरोळ्या आता बेजान वाटू लागल्या आणि मनाचे पक्षी बागडू लागले चांदण्यांच्या प्रतिभासंपन्न धवल धुक्यात जिथून अनेकदा सापडतात नव्या सोनेरी भविष्याच्या तेजोमय कडा .आणि मग त्या तेजल कडेच्या प्रत्येक बिंदुला आणि त्याच्या आस्तित्वाला असलेला गूढ अर्थ समजत जातो .हाच चंद्रकिरणांचा प्रदेश भेटला कॉलेज नावाच्या क्षितिजावर .आयुष्यात अनेक क्षितिजांवरून भ्रमण करत असताना हे क्षितिज मात्र नेहमी दिसत राहील .
जीवनाला नवे अर्थ मिळताना खरंच इतका वेगळा आणि स्वच्छंद अर्थ मिळेल असं वाटलं नव्हतं .या चंद्रकिरणांच्या प्रदेशात सगळेच लोक एक एक परी शोधत असतात .मला सापडली होती .ती सुंदर होती ,ती बालिश होती .जगापेक्षा तिला स्वतःच्या आयुष्यात रस होता .मला हेवा वाटणाऱ्या त्या बेधुंद आयुष्याची ति प्रतिकृती होती ..तिला नव्हती चिंता जगाची ,आव्हानांची आणि अडथळ्यांची ...सहज पेश होत होती ति प्रत्येक वेळी अगदी अलगदपणे ..कसलाही ताण नव्हता ..ति भेटली आणि माझ्या डायरीत एक वाक्य उमटलं जे कदाचित माझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्वाच्या हळुवार क्षणांची साक्ष होतं.तिचा तो स्वैर अंदाज आठवला आणि मी लिहिलं"तुझं मला भेटणं हा अगणित दिशांचा अकस्मात शोध होता ."
ति भेटायची आणि माझा आव्हानं पेलून त्यांना फोडून त्यांना जाळून भरलेल्या कातळी छातीमध्ये काही वेगळेच सूर ताल धरायचे .मलाही तेच बालिश आणि काही अंशी बावळट आयुष्य हवहवंसं वाटायला लागलं.तिचा सहवास मला बदलत गेला आणि मी माझ्या आयुष्याला स्वातंत्र्याच्या भिरभिरणाऱ्या वाऱ्यावर झोकून दिलं.त्या निरागस चेहऱ्यावर नजर रोखाताना तारांबळ व्हायला लागली .मी आवारा झालो .मी वारा झालो .एका अनाकलनीय दिशेच्या स्वर्गीय क्षितिजाकडे माझा प्रवास सुरु झाला .
एकदा ति आणि मी गप्पा मारत होतो .गप्पांना आता विषयांच बंधन असत नव्हतं.मुक्त संवाद होता बालिश मनांचा .तिला माझ्यात रस नव्हता आणि मलाही ..पण मी शिकत होतो ते विलक्षण आयुष्य प्रात्यक्षीकांच्या माध्यमातून ...मला तिने वेडं करून सोडला आणि मी झालोही .त्या बावळट ,बालिश आणि आवारा जीवनपद्धतीचा मी भाग झालो .ति मला स्टुपिड म्हणायची .मला स्टुपिड चा अर्थ नीट कळतही नवता आणि मी तीला विचारलं "स्टुपिड म्हणजे काय गं?"आता तिच्या मोकळ्या हसण्याने मला स्टुपिडपणाचं प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र एकाच वेळी मिळालं...
हा स्टुपिड शब्द आणि तो स्टुपिड बालीशपणा माझ्या आयुष्यात एक बिनधास्तपणा देऊन गेला .हळू हळू अडथळे मला अडकवून कंटाळली ...संकटाना टाईमपास घेत गेलो आणि पुन्हा यशाच्या त्या शिखरांना स्पर्श केला जी कधी मी मिळवली होती .ती आली आणि आयुष्याला नवा अर्थ मिळाला . अर्थांचे संदर्भ बदलले. जादुई आणि गुलाबी वातावरणात भारलेले ,मंतरलेले दिवस सुरू झाले . तिच्या येण्याने स्टुपीड जिंदगीला आनंदाची रेखीव किनार मिळाली.
आता मात्र स्टुपिड आयुष्यात मस्त आहे .इथे मरण स्वस्त नाही पण जगणं महाग नाही .मरण्याची भीती नाही पण जगण्याची मजा आहे .संकटांची भीती नाही त्यांना भिडण्याची सवय आहे .आनंदाची नशा नाही तर हे आयुष्यच नशा आहे .जे तिने मला दिलं .आणि त्याच आयुष्याची एक प्रथा म्हणूण तिचे धन्यवाद अदा करण्याचंही भान मला राहिलं नाही .खरच स्टुपिड आहे मी ...खूप काही मिळालं मला ..आवडतं मला हे "स्टुपिड “जगणं ....
अजिंक्य दंडवते
copyright@ajinkyadandawate
Photo by avinash jadhav.
मला माझ्या जाणत्या वयापासून आव्हानांनी खचाखच भरलेल्या आणि बिनधास्त बावळट जीवनांचा हेवा वाटायचा .आपणही ही जीवन जगावं असं मनोमन वाटायचं .आव्हानांना पोलादी हातांनी आणि वज्रमुठींनी फोडून काढावं असा वाटायचं .छातीतल्या धगधगणाऱ्या निखाऱ्याने संकटांना होरपळून काढावं वाटायचं .श्वासांच्या वादळाने त्या आव्हाणांची फोलपटांसारखी अवस्था करावी वाटते .कधी वाटतं इतकं बावळट व्हावं की आव्हानांनीच आपला पाठलाग करणं सोडून द्यावं .इतकं बेफिकीर व्हावं की अडथळ्यांनाच माझा हेवा वाटावा .जरी अडखळलो तरी ,जरी धडपडलो तरी त्याची काहीही तमा बाळगू नये . मान्यच करू नये की हा माझा अपमान आहे .मान्यच करू नये की ही माझी हार आहे .किंबहुना कळूच नये मला की हार काय आणि जीत काय ?इतकं स्वतंत्र व्हावं की एखाद्या आसमानाचा तारा व्हावं ,इतकं दिशाहीन व्हावं की आभाळाचा छोटासा तुकडा …पण तुटलेल्या पतंगाचं स्वातंत्र्य मला आवडत नसायचं कारण आयुष्याला काही अर्थ असावा उद्दिष्ट असावीत ही मात्र माझ्या विचारांमधली एक पक्की बाजू होती .कशी तयार झाली होती माहीत नाही .
ही राकट शौर्य सुद्धा मला नीरस वाटायला लागलं .त्या यशाची ,विजयाची नशा आता चढत नव्हती .ते सोहळे आता बेचव वाटू लागले .त्या टाळ्या ,तो जयजयकार ,त्या आरोळ्या आता बेजान वाटू लागल्या आणि मनाचे पक्षी बागडू लागले चांदण्यांच्या प्रतिभासंपन्न धवल धुक्यात जिथून अनेकदा सापडतात नव्या सोनेरी भविष्याच्या तेजोमय कडा .आणि मग त्या तेजल कडेच्या प्रत्येक बिंदुला आणि त्याच्या आस्तित्वाला असलेला गूढ अर्थ समजत जातो .हाच चंद्रकिरणांचा प्रदेश भेटला कॉलेज नावाच्या क्षितिजावर .आयुष्यात अनेक क्षितिजांवरून भ्रमण करत असताना हे क्षितिज मात्र नेहमी दिसत राहील .
जीवनाला नवे अर्थ मिळताना खरंच इतका वेगळा आणि स्वच्छंद अर्थ मिळेल असं वाटलं नव्हतं .या चंद्रकिरणांच्या प्रदेशात सगळेच लोक एक एक परी शोधत असतात .मला सापडली होती .ती सुंदर होती ,ती बालिश होती .जगापेक्षा तिला स्वतःच्या आयुष्यात रस होता .मला हेवा वाटणाऱ्या त्या बेधुंद आयुष्याची ति प्रतिकृती होती ..तिला नव्हती चिंता जगाची ,आव्हानांची आणि अडथळ्यांची ...सहज पेश होत होती ति प्रत्येक वेळी अगदी अलगदपणे ..कसलाही ताण नव्हता ..ति भेटली आणि माझ्या डायरीत एक वाक्य उमटलं जे कदाचित माझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्वाच्या हळुवार क्षणांची साक्ष होतं.तिचा तो स्वैर अंदाज आठवला आणि मी लिहिलं"तुझं मला भेटणं हा अगणित दिशांचा अकस्मात शोध होता ."
ति भेटायची आणि माझा आव्हानं पेलून त्यांना फोडून त्यांना जाळून भरलेल्या कातळी छातीमध्ये काही वेगळेच सूर ताल धरायचे .मलाही तेच बालिश आणि काही अंशी बावळट आयुष्य हवहवंसं वाटायला लागलं.तिचा सहवास मला बदलत गेला आणि मी माझ्या आयुष्याला स्वातंत्र्याच्या भिरभिरणाऱ्या वाऱ्यावर झोकून दिलं.त्या निरागस चेहऱ्यावर नजर रोखाताना तारांबळ व्हायला लागली .मी आवारा झालो .मी वारा झालो .एका अनाकलनीय दिशेच्या स्वर्गीय क्षितिजाकडे माझा प्रवास सुरु झाला .
एकदा ति आणि मी गप्पा मारत होतो .गप्पांना आता विषयांच बंधन असत नव्हतं.मुक्त संवाद होता बालिश मनांचा .तिला माझ्यात रस नव्हता आणि मलाही ..पण मी शिकत होतो ते विलक्षण आयुष्य प्रात्यक्षीकांच्या माध्यमातून ...मला तिने वेडं करून सोडला आणि मी झालोही .त्या बावळट ,बालिश आणि आवारा जीवनपद्धतीचा मी भाग झालो .ति मला स्टुपिड म्हणायची .मला स्टुपिड चा अर्थ नीट कळतही नवता आणि मी तीला विचारलं "स्टुपिड म्हणजे काय गं?"आता तिच्या मोकळ्या हसण्याने मला स्टुपिडपणाचं प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र एकाच वेळी मिळालं...
हा स्टुपिड शब्द आणि तो स्टुपिड बालीशपणा माझ्या आयुष्यात एक बिनधास्तपणा देऊन गेला .हळू हळू अडथळे मला अडकवून कंटाळली ...संकटाना टाईमपास घेत गेलो आणि पुन्हा यशाच्या त्या शिखरांना स्पर्श केला जी कधी मी मिळवली होती .ती आली आणि आयुष्याला नवा अर्थ मिळाला . अर्थांचे संदर्भ बदलले. जादुई आणि गुलाबी वातावरणात भारलेले ,मंतरलेले दिवस सुरू झाले . तिच्या येण्याने स्टुपीड जिंदगीला आनंदाची रेखीव किनार मिळाली.
आता मात्र स्टुपिड आयुष्यात मस्त आहे .इथे मरण स्वस्त नाही पण जगणं महाग नाही .मरण्याची भीती नाही पण जगण्याची मजा आहे .संकटांची भीती नाही त्यांना भिडण्याची सवय आहे .आनंदाची नशा नाही तर हे आयुष्यच नशा आहे .जे तिने मला दिलं .आणि त्याच आयुष्याची एक प्रथा म्हणूण तिचे धन्यवाद अदा करण्याचंही भान मला राहिलं नाही .खरच स्टुपिड आहे मी ...खूप काही मिळालं मला ..आवडतं मला हे "स्टुपिड “जगणं ....
अजिंक्य दंडवते
copyright@ajinkyadandawate
Photo by avinash jadhav.
Awsm��
ReplyDelete"मनाचे पक्षी बागडू लागले चांदण्यांच्या प्रतिभासंपन्न धवल धुक्यात जिथून अनेकदा सापडतात नव्या सोनेरी भविष्याच्या तेजोमय कडा .आणि मग त्या तेजल कडेच्या प्रत्येक बिंदुला आणि त्याच्या आस्तित्वाला असलेला गूढ अर्थ समजत जातो"
ReplyDeleteखूपच छान वाक्यरचना अजिंक्य....असच लिहीत राहा.
Dhanyavad...abhari ahe...
Delete👌👌👌👍
ReplyDeleteChan lihato. Tu lekhak ban.
ReplyDelete👌👌
ReplyDelete👌👌
ReplyDelete