Skip to main content

प्रासंगिक 2

   

हा काय कोलाहल आहे ?

आज काय सुरु आहे या राष्ट्रात ?केवळ प्रश्न आणि उत्तरांची अवास्तव स्वप्ने ...प्रश्न फार सोप्पे पण उत्तरे कधी मिळालीच नाहीत ...अनेक परंपरा ,विविधता ,जात आणि धर्माच्या आपण अभेद्य बनवलेल्या कड्या ....त्यातून झालेला एखाद्या माथेफिरू धार्मिक संघटनेचा जन्म ,त्यातून त्याच धर्माची तुडवली गेलेली तत्वे आणि स्वतःला पुढारलेल्या तत्वांच्या स्वरूपात पेश करण्याची घाई ....त्यात या सगळ्या विविधतेला डावलून नव्हे तर स्वीकारून एकतेचं अमृत पिऊन स्वीकारलेल ला ( काहींनी मनाविरुद्ध) पण थेट हृदयाजवळ ठेवलेला संविधान नावाचा गुरुमंत्र ....यात अनेक प्रधानमंत्र्यांची आणि राजनेत्यांची बदललेली, कधी उजळलेली भूमिका ,त्यातून भारताची  आणि पर्यायाने जनमानसाची भारतीय म्हणून उदयाला आलेली एक सोशिक अस्मिता...




          झालेली अनेक आंदोलने आणि त्यातून बदललेली मानसिकता  ...धर्म या अर्थपूर्ण शब्दाचा किंवा भावनेचा बदलेला अर्थ ,त्याची बदलेली व्याख्या आणि त्या शब्दामागे वाढलेला अंधत्वाचा आणि आंधळ्यांचा  रेटा ,भारतीय समाजव्यवस्थेमध्ये झालेला पाश्चात्यांचा हस्तक्षेप त्यातून भारतीय आधुनिकतेला लागलेलं चंगळवादी वळण ,राजकीय क्षेत्रात बोकाळलेला चंगळवाद आणि बिघडलेले स्वयंघोषित नेते ,त्यातून  त्यांना मिळालेला धार्मिक शक्तींचा (तथाकथित ) आधार .....समाजाच्या  अज्ञानाचा फायदा घेत कासोशीच्या प्रयत्नांतून उभी केलेली आंदोलने त्यातून होणारी हानी आणि मानवी मनांची पाशवी पिळवणूक ,आंदोलनांचे बदलणारे संदर्भ आणि आकड्यांमध्ये होणारी मानवसमूहांची गिनती ....मनचक्षुंच्या पटलावर उमटलेली आंदोलनांची आणि त्यांच्या हेतूंची काळी प्रतिमा ,अक्षम नेतृत्वाची मांदीआळी आणि सक्षम नेतृत्वांना ओळखण्यात  आलेलं अपयश किंवा पैश्याच्या माऱ्यामध्ये लुटली गेलेली भाबडी मने .....
           प्रत्येक गोष्टीत हवा असलेला  बदल पण हरवलेली दिशा ,बदल आणि बदलांची दिशा देणाऱ्यांची बेसुमार कत्तल ,त्यातून राष्ट्रगाड्यासाठी कमी पडणारा ऑक्सिजन आणि राष्ट्र म्हणून प्रसिध्द असलेल्या भारताचा अडखळलेला आणि गुदमरलेला श्वास ,त्यातून माझ्यासारख्या एखाद्या राष्ट्रभक्ताची या उत्तरांसाठी  सुरु असलेली दडपलेली धडपड आणि फक्त धडपड ....व्यर्थ पण अर्थपूर्ण धडपड ....दुर्लक्षित तरीही लक्षवेधी धडपड ....आणि त्या धडपडीतून बनणाऱ्या आणि निखाऱ्यासारख्या तळपणाऱ्या ठिणग्या ..केवळ काही वेळ जळणाऱ्या आणि लगेच दडपल्या जाणाऱ्या एखाद्या तथाकथिक आणि स्वयंघोषित नेत्याच्या आश्वासनासारख्या ...
मरण स्वस्त आहे आणि मरणाला हमीभाव मिळवण्याची बेभरवशाची लढाई...लढाईतून सांडणारे स्वस्त रक्त वाहत वाहत जाते कोण्या पुढाऱ्यांच्या घरात आणि मोठ्या किमतीने विकायला निघते वाजत गाजत ...विकलेली बुद्धी आणि बांधलेले हात घेऊन भविष्याची स्वप्न रंगवत चिरनिद्रा घेणारी अक्कलशुन्य पिढी परीक्षेसाठी अभ्यास करताना बिनप्रश्नांची उत्तरे कशी शोधणार ?....उत्तर मिळाले आणि ते मांडले  की कत्तल होते ,भांडले की दाबले जाते मग मूग गिळून मरणयातना भोगताना झुंडीचे जथेच्या जथे कत्तलीचा सराव करायला जाताना बघितले की स्वस्त रक्त पुन्हा मूठ आवळण्यासाठी स्नायूंना विचार देते पण हात भुकेच्या उंबऱ्याखाली अडकलेला असतो ....
                                  -अजिंक्य 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...