जुने शब्द माहीत करून घेण्याचा सिलसिला असाच सुरू राहील.जुन्या संस्कृती वर माझे प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे . या लेखांच्या माध्यमातून मलाही जुन्या आठवणी पुन्हा जगायला मिळतात .
ज्यांनी ऊसतोड पहिली आहे त्यांच्यासाठी हे शब्द नवे नाहीत . साखर कारखान्यांमध्ये होणारे घोटाळे , शेतकऱ्यांची लूटमार , काटामारीची बिमारी , दिवस दिवस ताटकळत बसलेले शेतकरी , ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्याचा , शिक्षणाचा , जीविताचा प्रश्न हे सगळे विषय बाजूला ठेऊन इथे फक्त त्या शब्दांना न्याय देऊ ...
ज्याची वाढ होते ते वाढे . वाढे हा ऊसाचा वाढणारा शेंडा असतो . जिथे ऊसाच्या कांड्या संपतात आणि कोवळा हिरवा भाग सुरू होतो तिथून ऊस आणि वाढे वेगळे केले जाते . कोयत्याने तोडणारा ऊस आणि वाढे वेगळे करतो . आता हे वाढे जनावरांना खाण्यासाठी नेले जाते . या वाढयावरची मालकी ऊस तोडणी कामगारांची असते . त्यामुळे वाढयातून मिळणारे पैसे हा त्यांचा बोनसच असतो .
अशा वाढयांना एकत्र करून त्यांची पेंडी बांधली जाते . त्याला भेळा म्हणतात . पूर्वी एका भेळ्यात दहाच्या आसपास वाढे असायचे . त्याची किंमत साधारण 100 ते 200 रुपये शेकड्याच्या आसपास असायची . आत्ताचे ऊसावले जरा हुशार आहेत . ते 20 वाढयांचा भेळा बांधतात आणि 400 रुपये शेकडा सांगत आहेत . मी आजच एक शेकडा घेतला . नंतर बाकीच्यांना वाढे मिळाले नाहीत . दुष्काळ असल्याने वाढयांना खूप मागणी आहे . 100 भेळे मला दोन दिवस जातील .
वाढयापासून वेगळा केलेला ऊस त्याच वाढयाने बांधला जातो . त्याला मोळी म्हणतात . मोळी हा शब्द सर्वांना माहीत आहे . त्यामुळे त्याचा जास्त विस्तार करत नाही . ऊसतोडणी कामगारांची छोटी छोटी मुले दिवसभर अर्धनग्न अवस्थेत त्या गचपणात फिरत असतात . खेळत असतात . फ्लॅटमध्ये ऐटीत असलेल्या आपल्या मुलांसारखे रडलेले मी त्यांना कधीच पाहिलेलं नाही .
असो गायींना ऊस जसाच्या तसा खाता येत नाही . चावता येत नाही त्यामुळे त्याचे साधारण 4 ते पाच इंच लांबीचे तुकडे केले जातात त्याला आमच्याकडे 'बीट्ट्या' किंवा 'गंडया' म्हणतात . हे एकतर कुट्टी मशीनने केले जाते किंवा अडकित्याने केले जाते . वेळप्रसंगी आम्ही कुऱ्हाड , कोयता किंवा विळा वापरतो .
मी सहाविला असेल तेव्हाची गोष्ट . आमच्या पाणंदीने एक ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होता . मी आणि माझी एक बहीण घरी येत असताना त्या ट्रॅक्टरमधून दोन उसाच्या मोठया मोळ्या खाली पडल्या . हळूहळू डुलत डुलत तो ट्रॅक्टर निघून गेला . नंतर त्या दोन मोळ्या घरी आणताना आमची झालेली तारांबळ लक्षात आहे . त्यानंतर त्यातला ऊस खाल्ल्यानंतर दोन दिवस साधी भाजीदेखील इतकी तिखट लागायची की ज्याचं नाव ते !
असो उसाच्या रसामुळे खूप ताकद येते असे आमचे निळूकाका सांगतात . त्यामुळे जर कधी ऊस खाण्याची संधी आली तर ती मी सोडत नाही ! तोंडाची पर्वा करत नाही!
- अजिंक्य
ज्यांनी ऊसतोड पहिली आहे त्यांच्यासाठी हे शब्द नवे नाहीत . साखर कारखान्यांमध्ये होणारे घोटाळे , शेतकऱ्यांची लूटमार , काटामारीची बिमारी , दिवस दिवस ताटकळत बसलेले शेतकरी , ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्याचा , शिक्षणाचा , जीविताचा प्रश्न हे सगळे विषय बाजूला ठेऊन इथे फक्त त्या शब्दांना न्याय देऊ ...
ज्याची वाढ होते ते वाढे . वाढे हा ऊसाचा वाढणारा शेंडा असतो . जिथे ऊसाच्या कांड्या संपतात आणि कोवळा हिरवा भाग सुरू होतो तिथून ऊस आणि वाढे वेगळे केले जाते . कोयत्याने तोडणारा ऊस आणि वाढे वेगळे करतो . आता हे वाढे जनावरांना खाण्यासाठी नेले जाते . या वाढयावरची मालकी ऊस तोडणी कामगारांची असते . त्यामुळे वाढयातून मिळणारे पैसे हा त्यांचा बोनसच असतो .
अशा वाढयांना एकत्र करून त्यांची पेंडी बांधली जाते . त्याला भेळा म्हणतात . पूर्वी एका भेळ्यात दहाच्या आसपास वाढे असायचे . त्याची किंमत साधारण 100 ते 200 रुपये शेकड्याच्या आसपास असायची . आत्ताचे ऊसावले जरा हुशार आहेत . ते 20 वाढयांचा भेळा बांधतात आणि 400 रुपये शेकडा सांगत आहेत . मी आजच एक शेकडा घेतला . नंतर बाकीच्यांना वाढे मिळाले नाहीत . दुष्काळ असल्याने वाढयांना खूप मागणी आहे . 100 भेळे मला दोन दिवस जातील .
वाढयापासून वेगळा केलेला ऊस त्याच वाढयाने बांधला जातो . त्याला मोळी म्हणतात . मोळी हा शब्द सर्वांना माहीत आहे . त्यामुळे त्याचा जास्त विस्तार करत नाही . ऊसतोडणी कामगारांची छोटी छोटी मुले दिवसभर अर्धनग्न अवस्थेत त्या गचपणात फिरत असतात . खेळत असतात . फ्लॅटमध्ये ऐटीत असलेल्या आपल्या मुलांसारखे रडलेले मी त्यांना कधीच पाहिलेलं नाही .
असो गायींना ऊस जसाच्या तसा खाता येत नाही . चावता येत नाही त्यामुळे त्याचे साधारण 4 ते पाच इंच लांबीचे तुकडे केले जातात त्याला आमच्याकडे 'बीट्ट्या' किंवा 'गंडया' म्हणतात . हे एकतर कुट्टी मशीनने केले जाते किंवा अडकित्याने केले जाते . वेळप्रसंगी आम्ही कुऱ्हाड , कोयता किंवा विळा वापरतो .
मी सहाविला असेल तेव्हाची गोष्ट . आमच्या पाणंदीने एक ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होता . मी आणि माझी एक बहीण घरी येत असताना त्या ट्रॅक्टरमधून दोन उसाच्या मोठया मोळ्या खाली पडल्या . हळूहळू डुलत डुलत तो ट्रॅक्टर निघून गेला . नंतर त्या दोन मोळ्या घरी आणताना आमची झालेली तारांबळ लक्षात आहे . त्यानंतर त्यातला ऊस खाल्ल्यानंतर दोन दिवस साधी भाजीदेखील इतकी तिखट लागायची की ज्याचं नाव ते !
असो उसाच्या रसामुळे खूप ताकद येते असे आमचे निळूकाका सांगतात . त्यामुळे जर कधी ऊस खाण्याची संधी आली तर ती मी सोडत नाही ! तोंडाची पर्वा करत नाही!
- अजिंक्य
Comments
Post a Comment