Skip to main content

Posts

Showing posts from 2018

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 10 : पाणंद

हा शब्द गुगल केला तर शे ता मधली वाट असा अर्थ मिळतो . या शब्दाचा अपभ्रंश होऊन ,  ग्रामीण लहेजा घेऊन हा शब्द पाणद, पाणंद, पाणंध, पाणंदी, पाणंधी अशा विविध रुपात नाचत आहे . शेतातून जाणारी वाट  म्हणजे "पाणंद " .   दुतर्फा झुडपांचं कुंपण असलेल्या अरुंदशा कुठल्याही वाटेला सर्रास पाणंद म्हटलं जातं .हि पाणंद अनेकांच्या आठवणींमध्ये जिवंत आहे . हा शब्द मात्र अस्तंगत होतोय . असो . हा शेताचा बांध असल्यामुळे पानंदीच्या दुतर्फा घायपात लावले जाते . त्याच्या टोकदार काट्यांमुळे कुंपण मिळते आणि मालाचे संरक्षण होते . पाणंद ही खूप जिव्हाळ्याची गोष्ट आहे . आजूबाजूला झाडाझुडपांचा गराडा , मोठ्या वृक्षांची सावली , मधेच आडवे येणारे छोटे ओढे , असंख्य पक्षी , साप , खारुताई , उंदीर , सरडे सर्वांचे एकत्रित अस्तित्व असणारी पाणंद सुंदर असते . मला हिवाळ्यात पाणंद विशेष आवडते कारण हिरव्यागार झाडीतून धुक्याच्या दुलईतून चालताना खोड्या कराव्यात तशी ती झाडे आपल्यावर दवबिंदू शिंपडत असतात . चुकूनजरी एखाद्या झाडाला धक्का लागला तरी सगळं पाणी अंगावर पडणार आणि थंडी वाजणार !खाली गवत देखील...

गावपण भाग ९ : विझारा

अजूनही गावाकडे अनेक जुने आणि सुंदर शब्द वापरात आहेत पण मला भीती आहे कि हे शब्द कालांतराने राहणार नाहीत.  त्यापैकी जेवढे जमतील तेवढे शब्द मी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय . इंग्रजी भाषेच्या आक्रमणाने आणि शुद्ध मराठी भाषेभोवती निर्माण झालेल्या प्रोपागंडाने ग्रामीण बोलीभाषा धोक्यात आल्या आहेत . खरं तर भाषेच्या शुद्ध रुपाइतकीच गोडी बोलीभाषांना असते . पण आता बोली भाषेत बोलण्याचा आग्रह देखील आपण धरू शकत नाही .  असो , आज आपण 'विझारा' हा शब्द शिकणार आहोत .  विझारा या शब्दाची संधी केली तर वीज + झरा = झरा अशी होईल . वीज पडल्यामुळे निर्माण झालेला झरा म्हणजे विझारा . पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटना घडतात , यामध्ये बऱ्याच वेळा जीवितहानी होते . त्यामुळे वीज पडण्याची भीती सर्वांनाच असते . जिथे पाणी असते तिथे वीज पडते असे म्हणतात . किंवा वीज जिथे पडेल तिथे पाणी काढते . अशीच आमच्या डोंगरावर वीज पडली आणि तिथून अव्याहत झरा वाहणे सुरु झाले . तोच हा विझारा  .  छायाचित्र : विझारा  गावाकडच्या लोकांना शब्दांची चिरफाड करण्याची फार सवय असते . साधे साधे शब्द दे...

प्रासंगिक भाग 8 : गावाकडची चूल टिकेल का ?

गावाकडे जाऊन आलो की मन तिकडे अडकून बसतं . तिकडच्या जगण्यातला साधेपणा खूप जास्त सुंदर आहे . इकडे शहरात भरून राहिलेला यांत्रिकपणा , नात्यागोत्यांचा गुंता , आधुनिकतेच्या नावा खाली सुरू असलेले ढोंग आणि आपल्या आयुष्याची सुरू असलेली मार्केटिंग मला असह्य होते . माझे प्रश्न साधे असतात . संध्याकाळी अंथरुणावर पाठ टेकली की प्रश्नांचं मोहळ उठतं . आईनंतर मला चुलीवरची भाकरी पुन्हा मिळेल का ? गावाकडची ती चूल टिकेल का ? गोठ्यात वासरू ओरडेल का ? घरासमोर पक्षी येतील का ? रांगडा बाज असलेली भोळी भाबडी जुनी माणसं पुन्हा तो रुपायएव्हढा बुक्का लावून काठी टेकवत येतील का ? हे प्रश्न हल्ली मला जगू देत नाहीत . बदलाच्या या कचाट्यात माझ्या मेंदूचे तुकडे व्हायला लागलेत . आयुष्यात काय साध्य करण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरू आहे ? हे सगळे थांबवले नाही तर याच्या शेवटाला थोड्याफार भावना उरतील का ? आयुष्य कोरडे होत चालले आहे ? समाज कोरडा पडत चाललाय . हे थांबेल का ? गाय वासराला चाटेल का ? पेटलेली चूल ऊब देईल का ? भाकरीचा पातोडा निघेल का ? भाकरीचा पातोडा निघण्यासाठी माणसाच्या मनं मोकळी असावी लागतात . दूध काढून झाल्...

गावपण भाग 8 : वाढं , मोळी आणि भेळा

जुने शब्द माहीत करून घेण्याचा सिलसिला असाच सुरू राहील.जुन्या संस्कृती वर माझे प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे . या लेखांच्या माध्यमातून मलाही जुन्या आठवणी पुन्हा जगायला मिळतात . ज्यांनी ऊसतोड पहिली आहे त्यांच्यासाठी हे शब्द नवे नाहीत . साखर कारखान्यांमध्ये होणारे घोटाळे , शेतकऱ्यांची लूटमार , काटामारीची बिमारी ,  दिवस दिवस ताटकळत बसलेले शेतकरी  , ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्याचा , शिक्षणाचा , जीविताचा प्रश्न हे सगळे विषय बाजूला ठेऊन इथे फक्त त्या शब्दांना न्याय देऊ ... ज्याची वाढ होते ते वाढे . वाढे हा ऊसाचा वाढणारा शेंडा असतो . जिथे ऊसाच्या कांड्या संपतात आणि कोवळा हिरवा भाग सुरू होतो तिथून ऊस आणि वाढे वेगळे केले जाते . कोयत्याने तोडणारा ऊस आणि वाढे वेगळे करतो . आता हे वाढे जनावरांना खाण्यासाठी नेले जाते . या वाढयावरची मालकी ऊस तोडणी कामगारांची असते . त्यामुळे वाढयातून मिळणारे पैसे हा त्यांचा बोनसच असतो . अशा वाढयांना एकत्र करून त्यांची पेंडी बांधली जाते . त्याला भेळा म्हणतात . पूर्वी एका भेळ्यात दहाच्या आसपास वाढे असायचे  . त्याची किंमत साधारण 100 ते 200 रुपये शेकड्य...

प्रासंगिक 7 :माऊली सभागृहातला एकच प्याला रंगला !

तुडुंब भरलेले माऊली सभागृह , अत्तराचा सुगंध आणि जाणत्या प्रेक्षकांसमोर सादर होणारा राम गणेश गडकरींच्या एकच प्याला चा प्रयोग . ऐन दिवाळीच्या मंगलमय प्रभाती हा अलभ्य लाभ मला मिळाला . माझ्या मराठीची गोडी एवढी अवीट का आहे हे कळले . टाळ्या आणि मोकळ्या मनाने दिलेली दाद हेच लक्षात राहील . संगीत नाटकं दुर्मिळ होत गेली . किंबहुना नगरकर रसिक प्रेक्षकांना संगीत नाटकं नगरमध्ये क्वचितच ऐकायला मिळाली .  नाटक संपल्यानंतर मी असे नाटक पहिल्यांदा बघत आहे असे म्हणणारे खूप प्रेक्षक भेटले . एकंदरीत संगीत , अभिनय , कला , भाषा , संस्कृती या सर्वांचा एकत्रित मेळ घालून बनलेले आणि सादर झालेले हे नाटक नगरच्या इतिहासात अजरामर होईल . धनश्री खरवंडीकरांनी साकारलेली सिंधू मात्र सर्वांच्या लक्षात राहिली . दारुड्या नवरा असूनही पतिव्रता म्हणून तिने प्राणांतिक संभाळलेला संसार डोळे ओले करून गेला . अनिकेत देऊळगावकर देखील प्रेक्षकांना सुधाकर होऊन भेटला आणि व्यसनामुळे आयुष्य उध्वस्त होईल हे ओरडून सांगत राहिला .नाटकातला तळीराम विसरणे केवळ अशक्यच . लक्ष्मिशी सारीपाट खेळणारे तुमचे कुल आणि तुमच्यावर काय वेळ आली ?...

गावपण भाग ७ : पाणतास

 भारी , भन्नाट शब्द आज आपण शिकणार आहोत . आता पाणतास शब्द ज्यांना माहित आहे त्यांच्या मनाला थोडासा गारवा जाणवला असेल . गारव्याचे कारण असे कि पाणतास म्हणजे शेतातलं पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी खोदण्यात आलेला चर .  गावाकडे तास म्हणजे अजून एक वेगळा अर्थ आहे . शेतात बैलांच्या सहाय्याने काम करताना एका बाजूने नांगरत , पेरत , पाळी घालत किंवा कोळपत जाताना जेवढी जमीन उकरली जाते त्या सरळ पट्ट्याला तास म्हणतात . म्हणून पाणी  + तास = पाणतास (पाणी काढून देण्यासाठीचा तास ) असा शब्द तयार झाला .   या पाणतासाच्या जवळ जाणारा 'पाणंद' असा अजून एक शब्द आहे पण त्यावर आपण नंतर एखाद्या लेखात सविस्तर बोलू .   पाणतासाचा आणि आमचा संबंध शक्यतो उन्हाळ्यात यायचा . एरवी पाणतास हि प्रचंड अडचणीची , अनेक झाडाझुडपांनी आणि वेलींनी आच्छादलेली  त्यामुळे तिकडे जाण्याची कुणाची हिम्मत नसते . सर्व झाडांची एकत्रित वाढण्याची स्पर्धा असते . यात मात्र कावळीचा , गुळवेलाचा , नागिणीचा , असे अनेक वेल असतात . या गर्दीत गम्मत अशी होते कि या वेली सर्वांवर बाजी मारतात . झाडा...

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 6 : केळी

  तुम्ही म्हणाल केळी मला माहीत आहे .पण नाही! गावाकडे 'केळी' या शब्दाचा एक वेगळा अर्थ होतो . खायची केळी आणि आज ज्यावर लिहिणार आहे ती 'केळी' संपूर्ण वेगळी आहे . गावाकडे 'केळी' शब्दाचा अर्थ छोटा माठ असाही होतो . आहे की नाही गम्मत ! माडक्यांपेक्षा थोडी मोठी आणि माठापेक्षा थोडी छोटी ती केळी .   शक्यतो गावाकडे सगळी श्रमिक मंडळी असतात . दिवसभर उन्हातान्हात काम करणारी ही मंडळी खेड्याचं चैतन्य असतात .सगळी कामे अगदी ठेपशिर सुरू असतात . व्यवहार देखील शांत असतात .आजकाल राजकारणामुळे गावाकडे देखील माणसांची थेरं बदलली आहेत . ते मी पण मान्य करतो . असो , केळी हा प्रकार उन्हाळ्यात जास्त पहायला मिळतो .कारण उन्हाळ्यात थंड पाण्याची जास्त गरज असते . थंड पाण्यासाठी एकतर विहिरीत उतरून पाणी प्यावं लागेल नाहीतर पाणी थंड राहील याची दक्षता घ्यावी लागेल . पाणी जर तांब्याच्या ,पितळेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवले तर लवकर कक्ष तापमानाला येते .थंड राहत नाही . खेड्यात फ्रीज आहेत पण लाईट नसते . अशा वेळी जुने ते सोने या न्यायाने केळी आणली जाते . मोठ्या आकाराचा माठ सांभाळायला...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...

प्रासंगिक 5 : ललित

अंगाला झोंबणारा उष्ण वारा , काळी ठिक्कर पडलेली गोडी बाभळ , वाळलेलं अर्ध मार्ध खाल्लेलं कसन आणि वाऱ्याबरोबर हलणारी त्याची निष्प्राण पाती , अंधुक निरभ्र आकाश , सगळं काही निराशादायक .  पाऊस नावाचं चैतन्य हरवल्यामुळे . समोर चरणारं हडकुळं वासरू आणि त्याच्या पाठीमागे खपाटलेल्या पोटाची मोठ्या शिंगाची गाय . निष्प्राण गवत खाऊन प्राणपूजा करत ते जगत आहेत . दुपारपेक्षा संध्याकाळ बरी असं म्हणत निवांत जे मिळेल ते पोटाच्या पिशवीत भरण्याची त्यांची सुरू असलेली धडपड . दूरवर दिसणारा एखादा हिरवा ठिपका पण अवतीभोवती पडलेली नुसती आग . येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबर वाटेवर उडणारा धुरळा पुन्हा शांत पडतो . सगळे कसे अंधाराच्या अनामिक कुशीत झोपायला सज्ज .... मावळतीला उधळलेला लाल , केशरी, पिवळा रंग . रंगामागे भौतिकशास्त्र आहे की निर्मात्याची सौंदर्यदृष्टी? हे विश्व रंगहीन आहे तरी रंग बघण्यासाठी डोळ्यांची असलेली क्लिष्ट रचना . दिवसाच्या संपण्याचे दुःख आहे की नव्या प्रभातीची प्रतीक्षा ?  अनेक प्रश्न , उत्तरं , संकल्पना , विचार ,विचारप्रवाह , सत्य , असत्य ,  प्रतिभा , प्रतिभेचं मोजमाप , त...

प्रासंगिक 4 :हेडफोन

"काय सारखं कानात खुंट्या ठोकून बसलाय ....!!!."हे वाक्य आपल्या सर्वांच्या कानी आलेच असेल . " कानात खुंट्या ठोकून बसने हे तुला अजिबात शोभत नाही , टुकारपणाची लक्षणे आहेत ही "असं कितीही चिडवलं तरी आम्ही मात्र हेडफोन वापरतो . प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांचे सर्वात मोठे अस्त्र म्हणजे मोबाईल आणि छोटे हत्यार म्हणजे हेडफोन ! गुपचिप खूप वेळ गप्पा मारताना हेडफोन लागतोच ...त्यातून पाठवलेले किसेस ,  गुलाबी गप्पा , सिक्रेट्स सगळं काही हेडफोनच्या भावविश्वाचा एक भागच . अगदी ब्रम्हानंदी टाळी लागते हेडफोन घातले की ! कानाला लावून बोलायच्या डबड्या फोनपासून कानात घालायच्या ब्लुटूथपर्यंत तंत्रज्ञान उत्क्रांत झाले . एक थेंब पाणी गेले तरी बिघडणाऱ्या यंत्रापासून पाण्यात वापरायच्या यंत्रापर्यंत आपण मजल मारली . आपल्या सुखासाठी मानवाची ही अथक धडपड फार रोमहर्षक आहे . विमानात न मावणाऱ्या कॉम्पुटर पासून ते थेट आपल्या घड्याळात आलेल्या कॉम्प्युटरचा हा प्रवास अलीकडच्या काळात प्रचंड झपाट्याने झाला . या सगळ्यात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये हेडफोनशी प्रत्येकाचे अगदी जिव्हाळ्याचे नाते आहे . अगदी ब...

प्रासंगिक 3

विखे पाटील कॅम्पस मध्ये खऱ्या अर्थाने रुजली कॉलेज संस्कृती! कोण ? कुठला ?कसा? यापेक्षा विखे पाटील कॅम्पसमध्ये म्हणजे पाटलांचा ! अशी एक वेगळी ओळख घेऊन या कॅम्पसमध्ये एका नव्या कॉलेज संस्कृतीने जन्म घेतला . जातपात, धर्म आणि उच्च निचतेच्या बेड्या फेकून देत इथल्या तरुणांनी एकत्र येत नवे आदर्श घालून दिले . फार्मसी ,इंजिनिअरिंग , मेडिकल तसेच अग्रीकल्चर असे अनेक अभ्यासक्रम इथे शिकतानाच मुले जीवन जगण्याची कला इथे शिकतात.  या गणेशोत्सवात अत्यंत भक्तिभावाने मुलांनी गणरायाची प्रतिष्ठापना इथे केली आहे . मनात आलं तर लाथ मारील तिथे पाणी काढील अशा पिळदार मनगटांची एक फौज इथे सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर असते . लांबून आलेल्या मुलांचे प्रॉब्लेम सिनिअर मुले समजून घेतात . सुख दुःखात एकमेकांना घरच्यासारखा आधार देतात . एखाद्याच्या शिक्षणाला मदत करणे असो किंवा एखाद्याची शालेय फी देने असो इथला प्रत्येक जण मोकळ्या हाताने मदत करतो आणि यातूनच एक जिव्हाळ्याचे नाते या परिसरासोबत तयार होते . इथे सुमारे 20 गणेश मंडळे असतील . एकमेकांच्या संमतीने रोज एका वेगळ्या ठिकाणी गोडधोड महाप्रसाद असतो . हॉस्टेलची म...

गावपण भाग 4 :ताल आणि बांधारी

ताल आणि बांधारी ताल शब्द नाही पण या शब्दाचा अर्थ हरवतोय . मराठी भाषेत हा शब्द दोन तीन अर्थांनी वापरला जातो . एक ताल संगीतातील आहे . ताल या शब्दाचा दुसरा अर्थ रीत किंवा पद्धत असाही होतो . बेताल म्हणजे ताल नसलेला किंवा अनियंत्रित असा . असो आपण गावपन या सदरात गावामध्ये वापरल्या जाणऱ्या ताल या शब्दविषयी बोलू . याआधी आपण खिळपाट , आरण ,कालवड असे  मराठी भाषेतून गायब होत चाललेले शब्द समजून घेतले . यातल्या खिळपाटाशी साम्य सांगणारा शब्द आहे ताल . खिळपाट हा शब्द नपुसकलिंगी तर ताल हा शब्द स्त्रीलिंगी आहे . दगडाची ओबडधोबड रचलेली जाड भिंत म्हणजे ताल . ताल ही खिळपाटाच्या तुलनेत छोटी पण रुंद असते . पाण्यामुळे जमिनीची झीज होऊ नये म्हणून घातलेला दगडी बांध म्हणजे ताल . खिळपाटाप्रमाणे ताल देखील माती ,सिमेंट अशा गोष्टींशीवाय बांधलेली असते त्यामुळे इथे सुद्धा कसब लागते . पूर्वी डोंगरउतारावर शेती केली जायची तेव्हा माती धरून रहावी आणि पाणी अडवून राहावे यासाठी ताल घातली जायची . यामुळे मृदा आणि जलसंधारण व्हायचे . जमिनीला उतार जास्त असेल तर तो कमी करण्यासाठी ताल घातली जाते . तालीची रुंदी साध...

गावपण भाग 3

 कालवड  नात्यातला हळुवारपणा , भावनिक गुंता , प्रेमाचे आणि वात्सल्याचे सूर घेऊन वाहत असते . गावकऱ्यांचा रांगडा बाज आणि निसर्गाच्या रंगाचा रंगलेला साज घेऊन गावपण प्रवाही होत असते . गावात एकीची उब असते आणि आधुनिकतेचा उहापोह नसतो . जीवाला जीव देण्याची नितळ भावना असते जीवाला जपून माणुसकीचे गोडवे गाणाऱ्यांची संवेदनाहीन परंपरा नसते . माणूसपण जपणाऱ्या प्रथा असतात पण रक्तरंजित घटना घडवणारी पोकळ डोकी नसतात . अर्थात याला अपवाद असतातच . अपवादांची देखील काही अंशी वेगळी मजा असते . त्यावर नंतर कधी बोलू .....   ज्या वेळी शहरात प्रचंड धांदल असते . गडबड असते . आणि जो तो आपले रुटीन उरकण्यात व्यस्त असतो तेव्हा आमच्या गावाकडं मंजुळ आवाजात लहानसे वासरू दावणीतला चारा चघळत आईची वाट बघत असते . दावणीत चारा असतो . पाणी असते पण वासरू आईची मन लावून वाट पाहत असते . त्याला आपण काहीही केले तरी वाट बघण्यापासून परावृत्त करू शकत नाही . त्या दावणीला त्याच्या आईच्या मायेची उब असते . मालकाच्या गावठी पण रांगड्या बाजाचा सुगंध असतो . गोठ्यात छान आणि गोंडस 'कालवड' असेल तर दिवसभर अगदी मंजुळ आवाजात ओरड...

आकाशाखालच्या आठवणी 3

पागल.... आकाशाखाली उभे राहिले की आकाशाखालच्या आठवणी आठवतात .त्या कधी रम्य असतात तर कधी रोमांचकारी. कधी भावनातिरेकाने व्याकूळ झालेल्या असतात तर कधी आनंदाने उन्मत्त !पण आठवणी या भूतकाळ सुद्धा जगायला देणारी जादू असतात !भूतकाळ हा आपल्या हातून  निसटलेला काळ ही व्याख्या मला पटत नाही . भूतकाळ हा न जगलेला काळ असतो. त्या काळातील एकही क्षण आपल्याला आठवत नाही तो काळ म्हणजे भूतकाळ . येथे प्रश्न असा उपस्थित होतो की भविष्यकाळ सुद्धा आपण जगत नाही मग फक्त भूतकाळच न जगलेला काळ कसा? हा खूप बालिश प्रश्न होता.  तर भूतकाळातला एखादा क्षण आपल्याला आठवत नसेल तर त्या काळापुरता आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नव्हता  हे मात्र नक्की! खरं  सांगायचं झालं तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला ,वेळेला ,प्रसंगाला ,संकटाला ,अडथळ्याला, दुःखाला आणि आनंदाला सुद्धा आपण कसे सामोरे जातो, त्या त्या वेळी आपण कसे सादर होतो ? हे महत्त्वाचे . प्रत्येक घटिका आठवण बनून राहिली तर आयुष्य किती सुंदर बनेल नाही ? आयुष्य अनेकदा वळणं घेत असतं.  संथ तर कधी वेगात पुढे जात असतं . काहीवेळा एखाद्या वळणावर कोणी भेटतं किंवा ...